AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही

हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 15, 2022 | 3:41 PM
Share

जालना : औरंगाबाद पाणी प्रश्नावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घेरल्यानंतर ही फक्त सुरूवात आहे. राज्यातील पाणी प्रशानावरून तुम्हाला झोपू देणार नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्याचीच प्रचिती आज जालन्यात आली. आज बुधवारी जालन्याचा पाणी प्रश्नावरून (Jalna water issue) भाजपकडूण विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी औरंगाबादप्रमाणेच येथेही जालनेकरांच्या जलाक्रोश पाहायला मिळाला. यावेळी फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मोर्चांची मालिका सुरू होईल की काय असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.

तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरकारने जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना या थांबवल्या. जसे औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न आहे तो तसाच येथेही आहे. येथेही 15 दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे जालन्याच्या जनतेते आक्रोश भरला आहे. ते आता आक्रमक झाले आहेत. तर जालन्याच्या उशाला घरण असूनही येथे 15 दिवसांनी पाणी येतं. ही कसली शोकांतीका? म्हणत फडणवीस यांनी टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिब कल्याणाचा मंत्र दिला. मात्र हे सरकार पैसा खर्च करत नाही. हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे. कामं करा… पाणी द्या. अन्यथा आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, आम्ही तुम्हाला कारभार करून देणार नाही.

तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचेही म्हटलं आहे. तर जोपर्यंत शुद्ध पाणी नळाला येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू असेही फडणवीस म्हणाले. तसेच आपल्या काळात प्रत्येक वेळी पैसा दिला, योजना दिल्या, जे मागितलं ते दिलं. मात्र आताचे सरकार हे झोपा काढत आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री येते आले नाहीत. तर त्यांनी पैसाही दिला नाही. त्यामुळेच भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. मता भगिनींनी मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागितलं मात्र ते इश्वराने दिलं. हे सरकार इश्वर भरोसे चाललं असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट