AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही

हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
| Updated on: Jun 15, 2022 | 3:41 PM
Share

जालना : औरंगाबाद पाणी प्रश्नावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घेरल्यानंतर ही फक्त सुरूवात आहे. राज्यातील पाणी प्रशानावरून तुम्हाला झोपू देणार नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्याचीच प्रचिती आज जालन्यात आली. आज बुधवारी जालन्याचा पाणी प्रश्नावरून (Jalna water issue) भाजपकडूण विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी औरंगाबादप्रमाणेच येथेही जालनेकरांच्या जलाक्रोश पाहायला मिळाला. यावेळी फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मोर्चांची मालिका सुरू होईल की काय असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.

तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरकारने जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना या थांबवल्या. जसे औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न आहे तो तसाच येथेही आहे. येथेही 15 दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे जालन्याच्या जनतेते आक्रोश भरला आहे. ते आता आक्रमक झाले आहेत. तर जालन्याच्या उशाला घरण असूनही येथे 15 दिवसांनी पाणी येतं. ही कसली शोकांतीका? म्हणत फडणवीस यांनी टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिब कल्याणाचा मंत्र दिला. मात्र हे सरकार पैसा खर्च करत नाही. हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे. कामं करा… पाणी द्या. अन्यथा आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, आम्ही तुम्हाला कारभार करून देणार नाही.

तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचेही म्हटलं आहे. तर जोपर्यंत शुद्ध पाणी नळाला येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू असेही फडणवीस म्हणाले. तसेच आपल्या काळात प्रत्येक वेळी पैसा दिला, योजना दिल्या, जे मागितलं ते दिलं. मात्र आताचे सरकार हे झोपा काढत आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री येते आले नाहीत. तर त्यांनी पैसाही दिला नाही. त्यामुळेच भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. मता भगिनींनी मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागितलं मात्र ते इश्वराने दिलं. हे सरकार इश्वर भरोसे चाललं असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.