AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून सरकारने त्यांना सरसकट मदत करावी अशी अपेक्षा आहे. मात्र सरकारने अद्याप पंचनामे देखील केले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून सरकार निवडणूक प्रचाराला गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सरकारला वेळ नाही अशी टिका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला
vijay vadettiwar
| Updated on: Dec 07, 2023 | 1:02 PM
Share

मुंबई | 7 डिसेंबर 2023 : अवकाळी पाऊस आणि नंतर चक्रीवादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली असून राज्य सरकारने हात वर केले आहेत. शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. चक्रीवादळाने 22 जिल्हे उद्धवस्त झाले आहे. सरसकट मदतीची अपेक्षा होती. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. परंतू पूर्णपणे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती या नव्या शब्दाचा खेळ केला असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा फटका बसला आहे. उपसमितीची बैठक झालेली नाही. केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. चक्रीवादळाचा फटका 22 जिल्ह्यांना बसला असून शेतकरी उद्धवस्त झाला असतानाही राज्य सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती असे तिचे नामकरण करीत मदतीपासून वंचित ठरविल्याची टिकाही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. त्यांचे कर्जमाफीची गरज असतानाही सरकारने अद्याप पंचनामे देखील पूर्ण केलेले नाहीत अशीही टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रातीस शेतकरी होरपळून निघाला आहे. सरसकट कर्जमाफीची गरज आहे. दक्षिणेकडून आलेल्या चक्रीवादळाने काहीही राहीलेले नाही. सरकारचा कुणी प्रतिनिधी नुकसान पहायला गेलेला नाही. मुख्यमंत्री इतर राज्यात प्रचारासाठी व्यस्त होते. त्यांना बांधावर जायला वेळ नव्हता असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महायुती सरकारच्या पाठीशी

केंद्र सरकारच्या दुष्काळी निकषानूसार 40 तालुके घोषीत झाले आहेत. जे दुष्काळी निकषात बसत नाही, त्यांना राज्यसरकारने मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जी दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत मिळणार तिच दुष्काळसदृश्य तालुक्यांना दिली जाईल कुठलाच भेदभाव केला जाणार नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीठ कुठलेही नुकसान असो सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु केली आहे. 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टर केला आहे, नियमांपेक्षा जास्त निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?