AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून सरकारने त्यांना सरसकट मदत करावी अशी अपेक्षा आहे. मात्र सरकारने अद्याप पंचनामे देखील केले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून सरकार निवडणूक प्रचाराला गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सरकारला वेळ नाही अशी टिका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला
vijay vadettiwar
| Updated on: Dec 07, 2023 | 1:02 PM
Share

मुंबई | 7 डिसेंबर 2023 : अवकाळी पाऊस आणि नंतर चक्रीवादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली असून राज्य सरकारने हात वर केले आहेत. शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. चक्रीवादळाने 22 जिल्हे उद्धवस्त झाले आहे. सरसकट मदतीची अपेक्षा होती. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. परंतू पूर्णपणे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती या नव्या शब्दाचा खेळ केला असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा फटका बसला आहे. उपसमितीची बैठक झालेली नाही. केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. चक्रीवादळाचा फटका 22 जिल्ह्यांना बसला असून शेतकरी उद्धवस्त झाला असतानाही राज्य सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती असे तिचे नामकरण करीत मदतीपासून वंचित ठरविल्याची टिकाही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. त्यांचे कर्जमाफीची गरज असतानाही सरकारने अद्याप पंचनामे देखील पूर्ण केलेले नाहीत अशीही टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रातीस शेतकरी होरपळून निघाला आहे. सरसकट कर्जमाफीची गरज आहे. दक्षिणेकडून आलेल्या चक्रीवादळाने काहीही राहीलेले नाही. सरकारचा कुणी प्रतिनिधी नुकसान पहायला गेलेला नाही. मुख्यमंत्री इतर राज्यात प्रचारासाठी व्यस्त होते. त्यांना बांधावर जायला वेळ नव्हता असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महायुती सरकारच्या पाठीशी

केंद्र सरकारच्या दुष्काळी निकषानूसार 40 तालुके घोषीत झाले आहेत. जे दुष्काळी निकषात बसत नाही, त्यांना राज्यसरकारने मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जी दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत मिळणार तिच दुष्काळसदृश्य तालुक्यांना दिली जाईल कुठलाच भेदभाव केला जाणार नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीठ कुठलेही नुकसान असो सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु केली आहे. 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टर केला आहे, नियमांपेक्षा जास्त निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.