AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा क्षण, ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार आमनेसामने, काय घडलं?

महाराष्ट्राच्या राजकारणातील आज अतिशय महत्त्वाची घटना घडली. शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सडकूना टीका-टीप्पणी केली जाते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. असं असताना आज दोन्ही गटाचे आमदार नागपुरात विधान भवनाबाहेर एकत्र माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसले.

महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा क्षण, ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार आमनेसामने, काय घडलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 07, 2023 | 7:31 PM
Share

नागपूर | 7 डिसेंबर 2023 : शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवसआधी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. हा राडा इतका मोठा होता की पोलिसांना देखील आवरणं कठीण जात होतं. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार समोरासमोर आले. पण यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांनी सौजन्य पाळलं. पण तरीही दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांना मिश्किल टोले, टोमणे लगावले. यावेळी त्यांच्यात झालेलं संभाषण हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खरंच मनोरंजनात्मक आहे.

नागपुरात विधान भवनाच्या बाहेर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक समोरासमोर आले. विशेष म्हणजे तिथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तीनही नेते योगायोगाने एकत्रितपणे विधान भवनात प्रवेश करत होते. यावेळी वैभव नाईक यांनी संधी साधत भरत गोगावले यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. भरत गोगावले यांनी या अधिवेशनाला कोट घातला नाही, याचा अर्थ त्यांनी मंत्रिपदाची आशाच सोडलेली दिसतेय, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला. त्यावर भरत गोगावले यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत उत्तर मिळेल असं सांगितलं.

यावेळी भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना थेट शिंदे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली. इतके दिवस मी कुणीतरी येणार म्हणून मंत्रीपदासाठी थांबलो. त्यामुळे वैभन नाईक येत असतील तर आपण पुन्हा थांबायला तयार आहोत, असा टोला भरत गोगावले यांनी यावेळी लगावला. यावेळी तीनही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु होती.

तीन नेत्यांमधील टोलेबाजीचं संभाषण वाचा जसंच्या तसं

वैभव नाईक : मी आता कोट घातलाय. तुम्ही कोट घालायचा सोडून दिलाय. तुम्ही मंत्रिपदाची आशा सोडली का? असं लोक म्हणत आहेत.

भरत गोगावले : तू का घातला आहेस मग?

वैभव नाईक : थंडी वाजते म्हणून आणि आमचा कोट तर कायमच राहतो. भरत शेठ दर अधिवेशनाला कोट घालून यायचे. पण ते या अधिवेशनाला कोट घालून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाची आशा सोडली का?

भरत गोगावले : अधिवेशन संपता संपता सांगतो तुला

वैभव नाईक : हे तुम्ही दर अधिवेशनाला सांगत आहात

भरत गोगावले : हो, अधिवेशन संपायच्या वेळी सांगतो. वैभवची इच्छा असेल तर माझा कोट त्याला शिवून देतो. ऐक रे… मी थांबलोय, वैभव आमच्याकडे येत असेल तर त्यासाठी मी थांबू शकतो

वैभव नाईक : ही ऑफर कोण देतंय? ज्यांना मिळालं नाही ते ऑफर देत आहेत. आमची काय इच्छा आहे, विरोधी पक्षात जरी असलो तरी ज्या पद्धतीने त्यांनी उठाव केला होता, त्या पद्धतीने त्यांना मिळालं नाही. त्याचं दु:ख आम्हालासुद्धा आहे.

संजय शिरसाट : वैभव, त्यांचा व्हीप आम्हाला चालतो. त्यामुळे त्यांनी जर एखादं स्टेटमेंट केलं तर ते अधिकृत असतं. म्हणून जरा बघ बाबा

वैभव नाईक : मंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही कोट घाला. कोट घालून या. भरत शेठ शेठ वाटतात.

भरत गोगावले : असं?

वैभव नाईक : हो

भरत गोगावले : तुझा सल्ला असा चांगला असेल, काही चांगले सल्ले आम्ही मित्रांकडून घेऊ शकतो. तू आमचा पूर्वाश्रमीचा मित्र आहे. तुझे विचार चांगले आहेत. तू कोकणातला आहे. त्यामुळे मला तुझी आशा आहे.

वैभव नाईक : तुम्ही विषय दुसरीकडे करत आहात

संजय शिरसाट : नार्वेकरांकडे चाललेली हिअरिंग आहे. जेव्हा हिअरिंग संपेल तेव्हा काही लोक अपात्र ठरणार आहेत. तेव्हा अपात्र कोण होणार याबाबत आमचे वरिष्ठ नेते विचार करत असतील. त्यामुळे इनकमिंग होणार असेल त्यामुळे कदाचित विस्तार थांबला असेल. वैभव काही जरी झालं तरी आपण एक आहोत ते लक्षात ठेव

पाहा व्हिडीओ :

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा