AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती तानाजी सावंत यांनी 2017 ला शिवसेनेत प्रवेश होता. जेव्हा पक्षाने त्यांना यवतमाळमधून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली.

Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Tanaji Sawant : शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 09, 2022 | 1:17 PM
Share

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharshtra) मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार अशी टीका विरोधक करीत होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेतल्यानंतर विस्तार केला आहे. आज सकाळी शिंदे गटातील आमदारांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्यानंतर आमदारांचा राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली. आज भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मंत्री तानाजीराव सावंताच्या गावात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. सोलापूरच्या वाकाव गावामध्ये मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण,तरुणाईने केला हालगीनाद करीत मनसोक्त डान्स करीत केला आनंदोत्सव साजरा करीत आहेत.

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा परिचय

  1. – तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहेत
  2. – 2015 साली राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन शिवसेनेत प्रवेश केला
  3. – 2016 साली शिवसेना उपनेते म्हणून नियुक्त करण्यात आले
  4. – 2016 साली सावंत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले
  5. – 2017 साली उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नियुक्त
  6. – 2018 – तानाजी सावंत हे 2014 सालच्या सेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले.
  7. – 2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद येथील परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले
  8. – मात्र महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज होते
  9. – पुणे आणि सोलापुरातल्या बार्शीत तानाजी सावंत यांच्या शिक्षणसंस्था
  10. – तर उस्मानाबादमध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्याचे अध्यक्ष

मिळालेल्या संधीचं सोनं केल होतं.

पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती तानाजी सावंत यांनी 2017 ला शिवसेनेत प्रवेश होता. जेव्हा पक्षाने त्यांना यवतमाळमधून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. मूळचे सोलापूरचे असलेले तानाजी सावंत यांनी निवडणुकीत विजय मिळवून पक्षातील आपले स्थान मजबूत होते. तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे उस्मानाबाद आणि सोलापूरचे प्रभारी उपनेते म्हणून जबाबदारी दिली होती.

उद्योजक म्हणून ओळख

‘करोडपती’ म्हणून ओळखले जाणारे तानाजी सावंत यांनी राज्य परिषदेच्या निवडणुकीत 115 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती – ते जयवंत शिंक्षण प्रसारक मंडळ (JSPM) आणि उस्मानाबादमधील साखर कारखाना सांभाळतात. 1998 मध्ये स्थापन झालेल्या जयवंत शिंक्षण प्रसारक मंडळाचे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कॅम्पस आहेत. शैक्षणिक संस्था आणि साखर कारखाना आहेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.