AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच राज्यातील पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसनं काय धडा घेतला? डिजीटल सदस्य नोंदणीत 10 लाखाचा टप्पाही अपूर्ण!

काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एच. के. पाटील यांनी आता हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसला केलाय.

पाच राज्यातील पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसनं काय धडा घेतला? डिजीटल सदस्य नोंदणीत 10 लाखाचा टप्पाही अपूर्ण!
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 8:06 PM
Share

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबमध्ये तर सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेसचा (Congress) आम आदमी पक्षाने (Aam Aadami Party) सुपडा साफ केला. या पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसनं काही धडा घेतला नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K. Patil) यांनीच या नोंदणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एच. के. पाटील यांनी आता हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसला केलाय.

महाराष्ट्र काँग्रेसला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र, आता मार्चअखेर सुरु आहे. महिन्याचा शेवटचा आठवला सुरु असताना अद्याप 10 लाख सदस्य नोंदणीचा टप्पाही महाराष्ट्र काँग्रेसला गाठता आलेला नाही. यावरुन एच. के. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आता दिल्ली हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल पाटील यांनी या बैठकीत विचारला. महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा आणि कर्नाटकची कामगिरी चांगली आहे. मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह चांगला नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केलीय.

पटोलेंच्या दाव्याचं काय झालं?

काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला जानेवारी 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार असा दावा केला होता. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्य नोंदणी अभियान आहे. हे अभियान यशस्वी करण्यात महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, असं पटोले म्हणाले होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल- चव्हाण

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया देशात घातला त्याचे पुढले पाऊल म्हणजे हे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान आहे. मोबाईच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी होणार असून अत्यंत जलदगतीने होणार असून अत्यंत विश्वासार्ह आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले होते.

इतर बातम्या :

नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचं काय झालं? नाना पटोलेंचा खोचक सवाल

Kolhapur By Election : ‘अजूनही 24 तास बाकी, जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा!’ चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.