AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Fadnavis on Delhi protest: दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CM Devendra FadnavisImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 1:26 PM
Share

सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे. या आंदोलनात अनेक राजकीय लोक, कलाकार देखील सहभागी झाले. काल रात्री हे आंदोलन चिघळले आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. दगडफेक झाली. 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाले. यावर राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेहरा नसलेल्या लोकांकडून पोळी भाजण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कुठलंही आंदोलन असलं की काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात आणि आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीतील आंदोलन हे चेहराहीन होतं आणि त्यामुळे ते भरकटल. पोलिसांच्या गाड्या फोडल्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसानी वेळीच सगळं कंट्रोल केल नसत तर अनर्थ घडला असता. मी सगळ्या आंदोलनावर आरोप करत नाही काही लोक चांगल्या भावनेनेही करत असतील. पण काही लोकांना अराजकता माजवण्याचा हेतू असतो.’

पुढे ते म्हणाले, ‘सदाभाऊ काय बोलले ते मला माहिती नाही पण काही लोक चांगल्या भावनेने करत असतात काही लोक स्वार्थ साधत असतात. सगळे एका दिशेने जाणारे नसतात. काही जणांना नीट पण माहीत नाही. हवसे नवसे गवसे असेही काही पक्ष आहेत ज्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. असेही पक्ष यातून काही साध्य होईल का ते पाहत असतात.’

“दादांच्या जयंतीचे औचित्य साधत कर्जमाफीची पहिली यादी जाहीर”

अजित पवार यांच्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. या निमित्ताने अतिशय सुंदर असं चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेल आहे ज्यात दादांच जीवन पाहायला मिळतोय. त्यांची कारकीर्द या निमित्ताने पाहायला मिळतेय. दादांचा उमदा स्वभाव, त्यांच हास्य त्यांची कठोरता हे सगळं यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. इतक सुंदर चित्रप्रदर्शन आयोजित करणाऱ्यांच अभिनंदन. शक्यता आहे की उद्याच दादांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत.’

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?