AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : 18 जुलैपासून होणारं पावसाळी अधिवेशन लांबणीवर! मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं अधिवेशन पुढे ढकललं?

Maharashtra Legislative Assembly Rainy session postponed : रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अधिवेशन पुढे ढकललं?

Maharashtra Politics : 18 जुलैपासून होणारं पावसाळी अधिवेशन लांबणीवर! मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं अधिवेशन पुढे ढकललं?
विधान भवन...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 16, 2022 | 7:32 AM
Share

मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Rainy session) लांबणीवर पडलंय. 18 जुलैपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार होतं. पण अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. विधिमंडळ सचिवालयाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Election 2022) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी विधिमंडळात मतदार पार पडले, असंही विधिमंडळ सचिवालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, सध्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणं बाकी आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, मुख्य प्रतोद, राज्यपालांची भूमिका, अशा एकमेकांशी संबंधित असलेल्या राजकीय (Maharashtra Political Crisis) गुंतागुंतीचा पेच न्यायप्रविष्ट आहे. त्यातच अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पावसाळी अधिवेशनही पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय.

मग आता कधी होणार अधिवेशन?

दरम्यान, आता लांबलेलं अधिवेशन नेमकं कधी होणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. अद्याप याबाबतची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. संसदीय कार्य विभागाकडून पुढील तारीख जाहीर झाल्यानंतर अधिवेशनाबाबत पुढील वेळापत्रक जारी केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची दिली.

18 जुलैला राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकललं जाईल, अशी शक्यता होतीच. पुढे ढकलेलं अधिवेशन 19 किंवा 20 जुलैपासून घेण्यात येईलष अशी शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. दरम्यान आता नेमकं पुढे ढकलण्यात आलेलं अधिवेशन केव्हा होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अधिवेशन पुढे ढकललं का, असा प्रश्नही यानिमित्त राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. अनिश्चित काळासाठी पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून, आता अधिवेशन केव्हा सुरु होतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.