AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय, मुख्य प्रतोद अनिल पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Maharashtra MLC Election 2022 : शिवसेनेला राज्यसभेच्या वेळी जी मतं ठरली होती, ती देण्यात आली. जी मदत लागली ती राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे अपक्षांचा जो कोटा आहे. तो महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

Vidhan Parishad Election : पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय, मुख्य प्रतोद अनिल पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
अनिल पाटीलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला Image Credit source: twitter
| Edited By: महेश घोलप | Updated on: Jun 19, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) आपला तिसरा उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे आमदार तीन वेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच भाजपचे आमदार देखील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक पक्षाकडून आपल्या आमदारांची काळजी घेतली जात आहे. सोमवारी विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) मतदान होणार आहे. आमदार काही पहिल्यांदा फाईव्ह स्टारमध्ये आलेले नाहीत. ग्रामिण भागातील आमदारांना फाईव्ह स्टार काय आणि लहान हॉटेल काय काही फरक पडत नाही. त्यांना मार्गदर्शन हा महत्वाचा हेतू आहे. प्रत्येक पक्ष आपली गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपली रचना ठरवली आहे. तसेच स्ट्रटर्जी देखील ठरलीये, जो कोटा आहे त्याबद्दल तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्यादवारांचा विजय निश्चित

शिवसेनेला राज्यसभेच्या वेळी जी मतं ठरली होती, ती देण्यात आली. जी मदत लागली ती राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे अपक्षांचा जो कोटा आहे. तो महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीच सगळेचं उमेदवार जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदारांपेक्षा नेत्यांना जे वाटतंय त्यामुळे आमदार निवडून येतील असंही ते म्हणाले आहेत.

पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय

तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. मागच्यावेळी भाजपचा स्टॅटेस्टिक पद्धतीने आणि आमच्या दुर्लक्षपणामुळे विजय झाला. पण यावेळी तसं होणार नाही. सध्या भाजपाकडे कोटा नाही. त्यांचेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपच्या काही आमदारांचे पहिल्या, दुसऱ्याआणि तिसऱ्या निवडीची मतं आम्हाला मिळतील. तसेच त्यांचा पाचवा उमेदवार निवडून येणार नाही असं मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीस स्वप्नांचा विचार करत आहेत,

त्यांच्या पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय असाही टोला पाटील यांनी लगावला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.