AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर काँग्रेसला ही इमारतच बसायला राहिली नसती : संग्राम थोपटे

आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केल्यानंतर स्वतः संग्राम थोपटे काँग्रेस भवनाची पाहणी करण्यासाठी पोहचले (MLA Sangram Thopate on Congress Bhavan attack).

...तर काँग्रेसला ही इमारतच बसायला राहिली नसती : संग्राम थोपटे
| Updated on: Jan 01, 2020 | 11:22 PM
Share

पुणे : आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केल्यानंतर स्वतः संग्राम थोपटे काँग्रेस भवनाची पाहणी करण्यासाठी पोहचले (MLA Sangram Thopate on Congress Bhavan attack). त्यांनी काँग्रेस भवनातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस भवनाच्या इतिहासाची आठवण करुन दिली. 1999 मध्ये माझे वडील आनंदराव थोपटे यांनी काँग्रेस भवनाचा ताबा मिळवला नसता, तर काँग्रेस पक्षाला ही इमारत बसायलाही मिळाली नसती, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं (MLA Sangram Thopate on Congress Bhavan attack).

संग्राम थोपटे म्हणाले, “विरोधीपक्षातील लोकच येथे गोंधळ घालून आमच्यात वाद निर्माण करत असल्याचा मला संशय आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. कुणी हकालपट्टी करायची आणि काय बोलायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र स्थापना झाली. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या इमारतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा 1999 मध्ये माझे वडिल आनंदराव थोपटे, देवीदास भंसाळी आणि श्रीरंग चव्हाण या जुन्या काँग्रेस नेत्यांनी या इमारतीचा ताबा मिळवला.”

माझ्या वडिलांपासून आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करतो आहे. ताबा घेताना जे कुणी बोलत असतील ती मंडळी कोठे आहेत? ते मंडळी त्यावेळी पक्षात होती की नव्हते हाही प्रश्न आहे. निष्ठेच्या बाबतीत काँग्रेस पक्ष आणि थोपटे कुटुंब हे पहिल्यापासूनचं ठरलेलं समीकरण आहे. त्याबद्दल जर कुणी हकालपट्टीची चर्चा करत असेल तर त्यांनाच याबद्दल विचारलं पाहिजे. 1999 मध्ये काँग्रेस भवनाचा ताबा घेतला नसता, तर काँग्रेसला ही इमारतच बसायला राहिली नसती. ती इमारत वाचवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं, असंही संग्राम थोपटे यांनी सांगितलं.

काँग्रेस भवनावर हल्ला करणारे माझे समर्थक नाही : संग्राम थोपटे

काँग्रेस भवनावर ज्यांनी हल्ला केला ते माझे समर्थक नव्हते, असा दावा संग्राम थोपटे यांनी केला आहे. ते म्हणाले, “जो प्रकार येथे घडला तो निंदनीयच आहे. आत्ता मी मुद्दाम पाहणी करण्यासाठी आलो. या ठिकाणी जे नुकसान झालं आहे याची मी माहिती घेतली आहे. असे प्रकार यापुढे होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. काँग्रेस भवनमध्ये काही काचा फुटलेल्या दिसत आहेत. खुर्च्या, टेबल, काचा असं प्राथमिक नुकसान झाल्याचं दिसत आहे. आता येथे साफसफाई करण्यात आली आहे. चॅनलवर जे काही व्हिडीओ पाहिले त्यातही टेबल, खुर्ची आणि काचा फोडल्याचं दिसत आहे. जो प्रकार घडला तो अगदी अचनाक अनपेक्षितपणे घडला.”

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.