AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवैध वाळू उपसाविरोधात आमदारांचं 5 तास आंदोलन, महसूलमंत्र्यांचं बैठक लावण्याचं आश्वासन

आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार आंदोलनासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आहेत. आता या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले आहेत.

अवैध वाळू उपसाविरोधात आमदारांचं 5 तास आंदोलन, महसूलमंत्र्यांचं बैठक लावण्याचं आश्वासन
| Updated on: Mar 02, 2021 | 5:25 PM
Share

मुंबई : अवैध वाळू उपसा विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर 5 तासांपासून अधिक काळ आमदारांनी आंदोलन केलं. सकाळी 11 वाजेपासून आमदारांचं हे आंदोलन सुरु होतं. आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार आंदोलनासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. अखेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची भेट घेऊन विषय जाणून घेतला आणि त्यांचं महसूलमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं.(MLA’s agitation on the steps of Vidhan Bhavan against illegal sand extraction)

राज्यातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना हा विषय मोठा झाला आहे. सरकार बदललं तसं यांचं धोरणही बदललं असल्याचं आमदारांनी म्हटलंय. मध्यम वर्गालाही वाळूच्या लिलावात सहभागी होता यावं. गरिबांच्या घरांसाठी 6 ब्रास वाळू मोफत मिळाली पाहिजे, अशा मागण्या या आमदारांनी केल्या आहेत. सकाळी 11 वाजेपासून या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. देवेंद्र फडणवीस हे देखील दुपारी आमदारांची भेट घेतली आणि विषय जाणून घेतला.

फडणवीसांनी आमदार लक्ष्मण पवार आणि राजेश पवार यांचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवर बोलणं करुन दिलं. अवैध वाळू उपसा प्रश्नावर बैठक लावण्याचं आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिलं आहे. त्यानंतर या आमदारांनी आपलं आंदोलन संपवलं.

भाजप आमदाराचं वीजपंपासह आंदोलन

वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप आमदार राम सातपुते तर थेट विधानभवनात कृषी पंप घेऊन आले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने वीज कनेक्शन तोडणी न थांबविल्यास कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशाराच त्यांनी दिला.

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आज अनोखे आंदोलन केलं. सातपुते यांनी अंगात निषेधाचा फलक असलेलं बॅनर घातलं. त्यानंतर मोटरसह कृषीपंप हातात घेऊन ते विधान भवन परिसरात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या वीज बिलाला माफी मिळालीच पाहिजे, वीज कापणी रद्द करा अशी मागणी सातपुते यांनी केली. यावेळी सातपुते यांनी वीजबिल फाडून सरकारचा निषेधही नोंदवला. सातपुते यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या :

सरकारने राज्यपालांना पाठवलेलं भाषण चौकातल्या भाषणासारखं; फडणवीसांचा हल्लाबोल

भर सभागृहात मुनगंटीवार शिवसेना नेत्याला म्हणाले, तुम्ही सीएमपदाचे मटेरियल, राज्यमंत्र्यासारखी कृती नको!

MLA’s agitation on the steps of Vidhan Bhavan against illegal sand extraction

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.