AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
औरंगाबादेत मनसेचं आंदोलन
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 1:46 PM
Share

औरंगाबाद : सप्टेंबच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं होतं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. (MNS agitation in Aurangabad demanding help to farmers)

पंचनाम्याची नाटकं बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत करा, अशी आक्रमक मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मनसेकडून औरंगाबादेत आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तसंच मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मनसेचा विरोध

दरम्यान, लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केला होता. जनतेच्या जीवाशी खेळ करुन राजकारणाची पोळी भाजणारी महाभकास आघाडी. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारुन राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील!, अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

नवाब मलिकांचा मनसेला सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लखीमपूरच्या हिंसेवरून मनसेला धारेवर धरले. लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला.

इतर बातम्या :

यंदा शिवसेनेच्या मेळाव्यात ‘राम’दास कदम नाहीत, ऑडिओ क्लिपप्रकरण भोवलं?

VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

MNS agitation in Aurangabad demanding help to farmers

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.