AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजे म्हणाले, सत्तेतील लोकांनी, पवारांनी लक्ष घालावं, मोदींवरच्या प्रश्नावर म्हणाले राजकारण नको!

मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

राजे म्हणाले, सत्तेतील लोकांनी, पवारांनी लक्ष घालावं, मोदींवरच्या प्रश्नावर म्हणाले राजकारण नको!
| Updated on: Feb 11, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट झाल्याची उदयनराजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी केल्याचंही ते म्हणाले. पवारांची नैतिक जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.(MP Udanayaraje Sharad Pawar’s meeting on Maratha reservation issue)

उदयनराजेंचं पवारांना आवाहन

शरद पवारांची भेट घेतली, मोदींची भेट घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उदयनराजेंना विचारला. त्यावेळी “हा प्रश्न राजकीय नाही. यात राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत त्यात पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी. ती होताना दिसत नाही. याबाबत मी पवारसाहेबांना सांगितलं की, आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला झालं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.

अन्यथा उद्रेक होईल, राजेंचा इशारा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे पवारांची नैतिक जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा. मराठा आरक्षण देणार नसाल तर दिशाभूल का? एक श्वेतपत्रिका काढा. सरकारनं याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केलीय. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. वकिलांनी कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. वडिलकीच्या नात्यानं पवारांनी यात लक्ष घालावं, अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल, अशा इशाराही उदयनराजे यांनी दिलाय.

करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा : उदयनराजे

“तुम्हाला करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा. श्वेतपत्रिका काढा, जाहीर करा, पण ते तसं करत नाहीत. अशोक चव्हाण यांना हे समजायला हवं. त्यांना अनुभव आहे, आर्थिक, सामाजिकरित्या मराठा समाज मागे आहे. राज्याने कायदा केला आहे, श्वेतपत्रिका जारी करायला हवी, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

Special Report | पुण्यात लग्न समारंभात उदयनराजे आणि रामराजेंची गळाभेट

सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी

MP Udanayaraje Sharad Pawar’s meeting on Maratha reservation issue

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.