BMC Election 2022 Ward No 1 मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत पालिकांच्या यादीत नंबर एक वर असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड नंबर एक (BMC Ward No. 1) हा महत्त्वाचा वॉर्ड आहे. मुंबईची सीमा जिथून सुरु होते, तोच हा मुंबईचा (Mumbai Election) वॉर्ड नंबर एक. या वॉर्डची रचना, या वॉर्डमध्ये 2017 मध्ये महिला उमेदवार विययी झाली होती. शिवसेनेच्या महिला उमेदवारानं 2017 मध्ये वॉर्ड क्रमांक एक मधून विजय मिळवला होता. मुंबई पालिकेच्या (BMC Election 2022) वॉर्ड क्रमांक एक मध्ये कोणकोणता भाग मोडते आणि हा वॉर्ड नव्या संरचनेप्रमाणे, आता कसा झाला आहे, तेही समजून घेणार आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या वॉर्डमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. 2017 मध्ये मुंबई पालिकेच्या लढतीत सर्वच पक्ष एकएकटे लढले होते. मुंबईच्या वॉर्ड नंबर एकमध्ये नेमकं चित्र काय होतं, याचीही उत्सुकता लोकाांना लागली आहे. या लढतीत कोण बाजी मारतं, याकडे संपूर्ण मुंबईचं बारीक लक्ष लागलेलं असणार आहे. चला तर जाणून घ्या, मुंबईच्या वॉर्ड नंबरची एकची गोष्ट…
गणपत पाटील नगर, बोरीवली आरटीओ, दहिसर नदी, आयसी कॉलनी
वॉर्ड क्रमांक एक हा महिलांसाठी आरक्षित आहे असं वाटू शकतं. कारण 2017 साली या वॉर्डमध्ये सर्व महिलाच रिंगणात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. पण 2022 च्या पालिका निवडणुकीत हा वॉर्ड आरक्षित करण्यात आलेला नाही. वॉर्ड क्रमांक एक ओपन कॅटेगिरीमध्ये ठेवण्यात आला.
शिवसेनेच्या उमेदवाराचा 2017 च्या निवडणुकीत विजय झाला होता. वॉर्ड क्रमांक एकमध्ये 2017 साली अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये काटे की टक्कर झाली होती. मनसेचा उमेदवारही या वॉर्डमधून निवडणुकीला उभा राहिला होता. पण शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी 2017 साली वॉर्ड क्रमांक एकमधून शिवसेनेचा विजयी झेंडा पालिकेवर फडकवला होता. 1824 मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला होता.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | तेजस्वी घोसाळकर | 4913 |
भाजप | सुचि यादव | 2719 |
राष्ट्रवादी काँग्रेस | सरितादेवी पांडे | 207 |
काँग्रेस | शितल म्हात्रे | 2584 |
मनसे | ज्योती वाडेकर | 179 |
अपक्ष / इतर | रेखा यादव | 3089 |
सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत कोण जिरवणार आणि कोण मिरवणारी, याची चर्चा रंगली होती. गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात कोरोना काळात झालेलं काम, मुंबईतील पूरस्थिती, रस्ते नियोजन, मेट्रो, गटारं, नाले असे विषय निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शिवाय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यादाच मुंबई पालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीचा वेगळंच महत्त्व आणि वलय प्राप्त झालंय.