AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले

Ramdas Athwale on PM Narendra Modi : बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक, रामदास आठवले यांची टीका तर पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले...

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 24, 2023 | 11:36 AM
Share

मुंबई : बिहारमधील पाटन्यामध्ये देशाच्या 15 विरोधी पक्षांची काल एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. सर्व पक्षांनी आगामी काळातील निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षातील या बैठकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही आठवले यांनी भाष्य केलंय.

नरेंद्र मोदी यांचं कौतुक

बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते जातील आणि आपली भूमिका नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडतील. नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्ट्रॉंग आहे 2024 या निवडणुका आम्ही जिंकू. विरोधकांना पराभूत करण्याची नीती आमच्याकडे आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणं सोपं नाही, असं आठवले म्हणालेत.

नीतीश कुमार यांच्यावर टीका

युतीचा भाग असणारी जेडीयू बाहेर पडली. नीतीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडले. त्यांनी आरजेडीसोबत जात सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये नीतीश कुमार हे मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडीवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आमच्यासोबत युतीत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देखील ते अनेक वर्ष भाजपसोबत होते. बिहारमध्ये त्यांच्या कमी जागा आल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांची भाषा बदलली आहे, असं आठवले म्हणाले.

इस्कॉनची भूमिका आहे ती मानव जातीमध्ये शांती निर्माण झाली पाहिजे. आज देशाभरामध्ये आणि जगभरामध्ये इस्कॉन चे 1000 मंदिरं आहेत. शांतीचा संदेश देणारी ही संस्था आहे. सर्वधर्मसमभावची त्यांची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे संविधान आहे. हे सर्व धर्माच्या लोकांना न्याय देणारं आहेत. एकमेकांच्या धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आपली जबाबदारी आहे. शांतीच्या संदेश देत देत हे रथ यात्रा इथून निघणार आहे, असं आठवले म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...