AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले

Ramdas Athwale on PM Narendra Modi : बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक, रामदास आठवले यांची टीका तर पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले...

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले
| Updated on: Jun 24, 2023 | 11:36 AM
Share

मुंबई : बिहारमधील पाटन्यामध्ये देशाच्या 15 विरोधी पक्षांची काल एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. सर्व पक्षांनी आगामी काळातील निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षातील या बैठकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही आठवले यांनी भाष्य केलंय.

नरेंद्र मोदी यांचं कौतुक

बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते जातील आणि आपली भूमिका नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडतील. नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्ट्रॉंग आहे 2024 या निवडणुका आम्ही जिंकू. विरोधकांना पराभूत करण्याची नीती आमच्याकडे आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणं सोपं नाही, असं आठवले म्हणालेत.

नीतीश कुमार यांच्यावर टीका

युतीचा भाग असणारी जेडीयू बाहेर पडली. नीतीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडले. त्यांनी आरजेडीसोबत जात सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये नीतीश कुमार हे मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडीवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आमच्यासोबत युतीत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देखील ते अनेक वर्ष भाजपसोबत होते. बिहारमध्ये त्यांच्या कमी जागा आल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांची भाषा बदलली आहे, असं आठवले म्हणाले.

इस्कॉनची भूमिका आहे ती मानव जातीमध्ये शांती निर्माण झाली पाहिजे. आज देशाभरामध्ये आणि जगभरामध्ये इस्कॉन चे 1000 मंदिरं आहेत. शांतीचा संदेश देणारी ही संस्था आहे. सर्वधर्मसमभावची त्यांची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे संविधान आहे. हे सर्व धर्माच्या लोकांना न्याय देणारं आहेत. एकमेकांच्या धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आपली जबाबदारी आहे. शांतीच्या संदेश देत देत हे रथ यात्रा इथून निघणार आहे, असं आठवले म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.