AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले

Ramdas Athwale on PM Narendra Modi : बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक, रामदास आठवले यांची टीका तर पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले...

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले
| Updated on: Jun 24, 2023 | 11:36 AM
Share

मुंबई : बिहारमधील पाटन्यामध्ये देशाच्या 15 विरोधी पक्षांची काल एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. सर्व पक्षांनी आगामी काळातील निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षातील या बैठकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही आठवले यांनी भाष्य केलंय.

नरेंद्र मोदी यांचं कौतुक

बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते जातील आणि आपली भूमिका नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडतील. नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्ट्रॉंग आहे 2024 या निवडणुका आम्ही जिंकू. विरोधकांना पराभूत करण्याची नीती आमच्याकडे आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणं सोपं नाही, असं आठवले म्हणालेत.

नीतीश कुमार यांच्यावर टीका

युतीचा भाग असणारी जेडीयू बाहेर पडली. नीतीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडले. त्यांनी आरजेडीसोबत जात सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये नीतीश कुमार हे मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडीवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आमच्यासोबत युतीत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देखील ते अनेक वर्ष भाजपसोबत होते. बिहारमध्ये त्यांच्या कमी जागा आल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांची भाषा बदलली आहे, असं आठवले म्हणाले.

इस्कॉनची भूमिका आहे ती मानव जातीमध्ये शांती निर्माण झाली पाहिजे. आज देशाभरामध्ये आणि जगभरामध्ये इस्कॉन चे 1000 मंदिरं आहेत. शांतीचा संदेश देणारी ही संस्था आहे. सर्वधर्मसमभावची त्यांची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे संविधान आहे. हे सर्व धर्माच्या लोकांना न्याय देणारं आहेत. एकमेकांच्या धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आपली जबाबदारी आहे. शांतीच्या संदेश देत देत हे रथ यात्रा इथून निघणार आहे, असं आठवले म्हणाले.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.