AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार नाकाने कांदे सोलू नका, तुमचंच नाक कापलं जाईल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Sanjay Raut on Devendra Fadnavis : राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, राहुल कुल यांच्यासह भाजपवर संजय राऊत यांचे गंभीर आरोप; वाचा...

फार नाकाने कांदे सोलू नका, तुमचंच नाक कापलं जाईल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
| Updated on: Jun 22, 2023 | 11:08 AM
Share

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फार नाकाने कांदे सोलू नका, नाहीतर तुमचंच नाक कापलं जाईल, असं संजय राऊत म्हणालेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गणेश साखर कारखान्यात त्यांचा पराभव का झाला? कारण भ्रष्टाचार… त्यांचा पराभवही भाजपच्याच लोकांनी पराभव केलाय. झाकीर नाईक विखे पाटलांच्या संस्थेत साडे चार कोटी रुपये का देतो याची चौकशी करावी म्हणून गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहावं, असं राऊत म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांचे खास दौंडचे आमदार राहुल कुल यांनी 500 कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला. याची चौकशी कधी होणार?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. मंत्री दादा भुसे यांची चौकशी कधी होणार?, असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही खरोखर सच्चे असाल. तुमच्यावर खरंच संघाचे आणि अटलजींच्या विचारांचे संस्कार असतील तर तुमच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत ना मुख्यमंत्री आणि त्यांची पोरं-टोरं हे खरे कोव्हीड घोटाळ्याचे लाभार्थी आहेत. आम्ही म्हणत नाही की हा घोटाळा झाला. पण तुम्ही हा भ्रष्टाचार झाल्याचं सांगता. तर मग या लाभार्थ्यांवर कारवाई करा, असं संजय राऊत म्हणालेत.

राज्यात काही चुकीचं घडत असेल तर त्यावर महाराष्ट्रातील पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. पण तिथं केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत. हा राज्यातील गृहखात्याचा अपमान आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

सध्याचं सरकार सुडाच्या भावनेनं वागतंय. ठाकरे कुटुंबाची सुरक्षा काढणं, असे अत्यंत खालच्या दर्जाचे उद्योग सरकार करत आहे. हीच या सरकारची बौद्धिक आणि वैचारिक पातळी आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील, असं संजय राऊत म्हणालेत.

मणिपूर दोन महिनांपासून धगधगतंय. सरकारी आकडे काहीही म्हणो. पण चारशेहून अधिक निरपराध लोक मारले गेले आहेत आणि सरकार शांत बसलं आहे. पंतप्रधान युनायटेड स्टेट्समध्ये आहेत. पण इथं आमचं स्टेट मणिपूर धगधगतं आहे. या मुद्द्यावर सरकार सपशेल फेल ठरतंय. असं संजय राऊत म्हणालेत.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.