AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातलं वातावरण बदलतंय, 2024 ला ‘जायेगा तो मोदी ही’ याच घोषणा!; संजय राऊत यांचं लोकसभा निवडणुकीवर भाष्य

Sanjay Raut on Loksabha Election 2024 ; देशातलं वातावरण बदलत आहे. 2024 ला आयेगा तो मोदी नाह, तर जायेगा तो मोदीच्याच घोषणा असतील. 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप देशात हल्ला घडवण्याची भीती; संजय राऊत यांचं मोठं विधान, वाचा...

देशातलं वातावरण बदलतंय, 2024 ला 'जायेगा तो मोदी ही' याच घोषणा!; संजय राऊत यांचं लोकसभा निवडणुकीवर भाष्य
| Updated on: Aug 29, 2023 | 11:40 AM
Share

मुंबई| 29 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. अशात विविध दावे-प्रतिदावे तसंच घोषणा केली जात आहे. माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे. आम्हाला भीती वाटते. जसं गोधरा हत्याकांड केलं, असं म्हणतात. त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून ट्रेन बोलवतील आणि त्या एखाद्या ट्रेनवर हल्ला करतील. त्याच्या आगीचा डोंब उसळणार तर नाही ना अशी भीती वाटतेय.जसं पुलवामा घडू शकत त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल असे देशातील प्रमुख विरोधी पक्षाने भीती वाटत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

येत्या 2024 आयेगा तो मोदी नाही. तर जायेगा तो मोदी आशा घोषणा असतील. लोकसभेमध्ये आमचा 19 चा आकडा आहे. तो कायम राहील. उलट आणखी जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.  भाजपकडे 2024 च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही. या देशात बेरोजगारी महागाई आहे. चीनने घुसखोरी केलेली आहे. अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्याकडे लक्ष न देता धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं. हा एकच अजेंडा भाजपकडे आहे, असंही राऊत म्हणालेत.

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. याबैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय.या बैठकीला देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहतील. यात देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पण या बैठकीत जागा वाटपाची चर्चा या बैठकीत होणार नाही. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

इंडियाला कोणी काउंटर करू शकत नाही. आमची घोडदौड रोखणं कोणाला शक्य नाही. कोणी कितीही आडव्या या… कुणी काहीही करू शकणार नाही. येत्या निवडणुकीत इंडियाच जिंकेल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी एक महत्त्वाचे नेते आहेत. कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांचंच काम सध्या देशभरात दिसत आहे. भविष्यातील ते देशाचे नेतृत्व आहेत, असंही राऊतांनी म्हटलं.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.