मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्नावरून खा नवनीत राणा अधिकाऱ्यांवर बरसल्या

अधिकारी काम करत नाहीत आणि जनता आम्हाला दोष देते अशा शब्दात खासदार राणा या संमधीत अधिकाऱ्यांवर बरसल्याचे पाहायला मिळाले.

मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्नावरून खा नवनीत राणा अधिकाऱ्यांवर बरसल्या
खा नवनीत राणा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:18 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (Chikhaldara) तालुक्यात असलेल्या खडीमल गावातील पाणी टंचाईचे (water scarcity) भीषण वास्तव आलेला एक धक्कादायक आणि भयानक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर समाज माध्यमातून लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. त्यानंतर आता मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्नावरून खा नवनीत राणा (MP Navneet Rana) अधिकाऱ्यांवर बरसल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आज अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी दिशा समितीची बैठक घेतली. यावेळी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असलेल्या खडीमल गावातील पाणी टंचाईचा मुद्दा समोर आला. तसेच याबैठकीत मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्ना खा नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेकर धरले. तसेच अधिकारी काम करत नाहीत आणि जनता आम्हाला दोष देते अशा शब्दात खासदार राणा या संमधीत अधिकाऱ्यांवर बरसल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली. तर खडीमल आणि इतर गावांचा पाणी प्रश्न तातडीने सोडवावा अशा सूचना या बैठकीत खा. नवनीत राणा यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.