AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी आमदाराला उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलल्याने एक कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र (NCP activist wrote letter from blood) लिहीले आहे.

माजी आमदाराला उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र
| Updated on: Oct 06, 2019 | 3:57 PM
Share

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलल्याने एक कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र (NCP activist wrote letter from blood) लिहीले आहे. युवराज चावरे असे रक्ताने पत्र लिहिणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव (NCP activist wrote letter from blood) आहे. युवराज हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात राहणारा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी नाराज झालेल्या युवराजने रक्ताने जयंत पाटील यांना पत्र (NCP activist wrote letter from blood) लिहिले आहे.

गेल्या 20 वर्षांपासून या पैठण तालुक्यात संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादी जिवंत ठेवली. त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवस्वराज्य असो किंवा हल्लाबोल यासारखे अनेक पक्षाचे कार्यक्रम संजू भाऊंनी स्वखर्चातून केले. तालुक्यात पक्ष वाढीसाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत पक्ष बांधणी केली आणि आज त्यांच्यावर अन्याय झाला. पवारसाहेब, अजितदादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या पुढे कधीही न गेलेले संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का? असा प्रश्नही युवराजने उपस्थित केला आहे.

या करिता हे रक्तरंजित पत्र लिहीत आहे. साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात पक्ष उमेदवार गेल्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. अशा आशयाचे पत्र युवराज चावरे या कार्यकर्त्याने लिहिले आहे.

NCP activist wrote letter from blood

युवराजने लिहिलेल्या या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ (NCP activist wrote letter from blood) उडाली आहे. दरम्यान त्याच्या या पत्रावर पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली