AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही!”, सदाभाऊ खोतांना हिणवलं

पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी मात्र डावलण्यात आलंय. सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. त्याचाच धागा धरत आता राष्ट्रवादी युवकच्या वतीने टीका करण्यात आली आहे.

एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही!,  सदाभाऊ खोतांना हिणवलं
| Updated on: Jun 08, 2022 | 2:05 PM
Share

मुंबई : सध्या राज्यात राज्यसभा (Rajyasabha) आणि विधानपरिषद (Legislative Council) निवडणुकीचं वारं वाहतंय. अश्यात आज भाजपने आज आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रवीण दरेकरांसह (Pravin Darekar) प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना मात्र डावलण्यात आलंय. याची सध्या जोरदार चर्चा आहे. मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. त्याचाच धागा धरत आता राष्ट्रवादी युवकच्या वतीने टीका करण्यात आली आहे. “एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही!”, असं म्हणत राष्ट्र्वादी युवकचे रविकांत वर्पे (Ravikant Varpe) यांनी सदाभाऊ खोत यांना हिणवलं आहे.

रविकांत वर्पे यांचं ट्विट

रविकांत वर्पे यांनी ट्विट करत सदाभाऊ खोत यांना काही सवाल विचारलेत. “अहो सदाभाऊ खोत, निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा.भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली गरळ ओकली,आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं! भाऊ हे भाजपावाले घासभर खाऊ घालतात आणि कोस भर चालत नेहतात. भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो”

भाजपने आपले विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर केलेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. या दोघांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण त्यांना तिकीट न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.