AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मोदींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या या समर्थनामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचं मोदींनी मंत्र्यांना सांगितलं. बैठकीत मोदींनी निवडणुकीनंतरच्या प्रक्रियेबाबत सांगितल्याचीही माहिती आहे. निकालानंतर पुन्हा […]

पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?
| Edited By: | Updated on: May 22, 2019 | 5:38 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मोदींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या या समर्थनामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचं मोदींनी मंत्र्यांना सांगितलं.

बैठकीत मोदींनी निवडणुकीनंतरच्या प्रक्रियेबाबत सांगितल्याचीही माहिती आहे. निकालानंतर पुन्हा एकदा 25 मे रोजी कॅबिनेट बैठकीची गरज पडेल, असं मोदी म्हणाल्याची माहिती आहे. त्यामुळे कॅबिनेटची बैठक निकालानंतर दोन दिवसातच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी जेव्हा बैठकीत प्रचारादरम्यान लोकांनी दिलेल्या प्रेमाविषयी सांगत होते तेव्हा भावूकही झाले. 24 तारखेला सर्व निकाल हाती आल्यानंतर 25 मे रोजी पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीची गरज पडेल. या बैठकीत सोळावी लोकसभा विसर्जित करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्याचीही माहिती आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा आढावा घेण्यात आला. मोदींनी यापूर्वीच पुढील 100 दिवसांचा प्लॅन तयार केल्याचंही सांगितलं जातंय. नवीन सरकार आल्यानतंर नियोजनातच जास्त वेळ जातो. त्यामुळे हे नियोजन केल्याची माहिती आहे.

एनडीएच्या बैठकीत सर्व प्रमुख नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोलप्रमाणेच 23 मे रोजी भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असं सांगण्यात आलं. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी, एलजेपी प्रमुख रामविलास पासवान, अकाली दल प्रमुख प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल यांची उपस्थिती होती.

VIDEO :

Follow Us
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.