AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी ‘कुत्रा’ म्हणतोय, कुणी ‘अडाणी’, राणेंची दोन्ही मुलं रामदास कदमांवर घसरली!

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे विद्यमान आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जणू मोर्चाच काढला आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांनी कुठल्या-ना-कुठल्या विषयावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर टीकेचा भडीमार […]

कुणी 'कुत्रा' म्हणतोय, कुणी 'अडाणी', राणेंची दोन्ही मुलं रामदास कदमांवर घसरली!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे विद्यमान आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जणू मोर्चाच काढला आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांनी कुठल्या-ना-कुठल्या विषयावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. या टीकेची पातळी सुद्धा घसरल्याचे काही विधानांवरुन लक्षात येते. या सर्व टीका-टिप्पण्यांमुळे कोकणातील ‘शिवसेना विरुद्ध राणे’ हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

आमदार नितेश राणे यांनी याच महिन्यात 14 आणि 15 डिसेंबर अशा दोन दिवसात रामदास कदम यांना उद्देशून ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये नितेश राणे यांनी रामदास कदम यांचा ‘कुत्रा’ असा उल्लेख केला होता.

पहिला ट्वीट (14 डिसेंबर) : “स्व.मान बाळासाहेब असतील,राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात.. उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे.. रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही.. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!”

दुसरा ट्वीट (15 डिसेंबर) : “हा आमचा zuko .. या पुढे रामदास कदम ला हाच उत्तर देईल.. टक्कर बराबरी ची झाली पाहिजे ना बिचारया zuko वर अन्याय नको! आता होऊ दे.. काटे की टक्कर!!!”

निलेश राणे काय म्हणाले?

माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी प्रोजेक्टवरुन रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणे यांनी आजच हे ट्वीट केले आहेत.

पहिला ट्वीट : नाणारबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील हा प्रकल्प लादणार नाही,असे सांगितले होते. तरी वेगळ्या पद्धतीने हा प्रकल्प आणण्याचे काम सुरू आहे. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही.

दुसरा ट्वीट : “रामदास कदम अडाणी मंत्री आहेत. ते म्हणाले इको सेन्सीटीव्हमधून रत्नागिरीतील ९२ तर सिंधुदुर्गतील ९० गावे वगळण्यात येतील. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारला गावे वळवण्याचा अधिकार नाही, राज्य सरकार गावे वगळू शकत नाहीत. गावे वगळण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे.”

दरम्यान, नितेश राणेंची टीका असो वा निलेश राणे यांची टीका असो, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दोन्हींच्या टीकांकडे दुर्लक्ष केले असून, कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिली नाही. त्यामुळे रामदास कदम नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.