AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद नको म्हणणारे जास्त, ममताही महाविकास आघाडीच्या प्रेमात : शरद पवार

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रीपद नको म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. तसंच ममता बॅनर्जीही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले

राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद नको म्हणणारे जास्त, ममताही महाविकास आघाडीच्या प्रेमात : शरद पवार
| Updated on: Jan 02, 2020 | 4:46 PM
Share

अहमदनगर : “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रीपद नको म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. तसंच ममता बॅनर्जीही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले (Sharad Pawar on home ministry ). ते नगरमध्ये बोलत होते.

“मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आमच्याकडे चित्र वेगळेच आहे. मी विचारले की गृहमंत्री तुम्हाला हवे का, मात्र सर्वांनी नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(Sharad Pawar on home ministry )

“खाते वाटपावरुन अजिबात दबाव नाही. खात्याचे सर्व निर्णय झाले आहेत. कोणाकडे काय द्यायचे याचा निर्णय झाला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

ज्यांनी शपथ घेतली, त्यांच्या खात्याबाबत जो तो पक्ष ठरवेल. मात्र मंत्रिमंडळात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचे प्रयत्न आम्ही केला आहे. त्यांना जास्त काम आम्ही देणार आहोत. राज्यमंत्री कमी आहे, मात्र प्रत्येकाला जास्त खाते देणार असून, त्याचा निर्णय आज किंवा उद्या होईल असंही पवारांनी सांगितलं.

मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आमच्याकडे चित्र वेगळे आहे. गृहमंत्रिपद नको म्हणणाऱ्यांचीच जास्त संख्या राष्ट्रवादीत आहे, असा दावा पवारांनी केला.

तसेच मी परवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया वाचली, त्यांनी असे म्हटले की महाराष्ट्रातून शरद पवारांनी जो निर्णय घेतला त्यातून आम्हाला प्रेरणा मिळली. जर असा निर्णय बाकी सर्वांनी करायचा ठरवलं तर लोकांना पर्याय मिळेल. आम्ही समान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या मनात विश्वास आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

“त्याचबरोबर मला कालच ममता बॅनर्जींचं पत्र आलं आहे. त्या म्हणाल्या आम्ही देखील पुढाकार घेऊन एक बैठक बोलावली आहे. आम्ही अजून चर्चा करुन बाकीच्या लोकांशी बोलू” असं शरद पवारांनी सांगितलं.

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.