AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bacchu Kadu : हे तर नामर्द सरकार! केवळ सत्तेसाठी निर्णय घेतात- बच्चू कडू

Bacchu Kadu on PM Narendra Modi Government : केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर 40 % कर लावला आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांची केंद्र सरकारवर जहरी टीका; म्हणाले, हे तर हे तर नामर्द सरकार! तसंच नवनीत राणा धमकी प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहा...

Bacchu Kadu : हे तर नामर्द सरकार! केवळ सत्तेसाठी निर्णय घेतात- बच्चू कडू
| Updated on: Aug 22, 2023 | 3:18 PM
Share

पिंपरी चिंचवड | 22 ऑगस्ट 2023 : केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केलीय. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करतं. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही? अशा शब्दात कडू यांनी केंद्र सरकारला सवाल केलाय. केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर 40 % कर लावला आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

सरकार खाणाऱ्यांचा विचार करतं. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची टीका त्यांनी केली आहे. कांदा परवडत नसेल तर खावू नये म्हणता माझ्याकडे लसूण आहे. मुळाही आहे, अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे.

कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी मरणार आहे का? असा सवाल ही त्यांनी व्यक्त केला. कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. म्हणून तुम्ही एवढे घाबरता का? असा सवाल करताना बच्चू कडू यांनी सरकारला केला आहे. शिवाय केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंत्री विजयकुमार गावित यांनी सौंदर्यावर बोलताना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा संदर्भ दिला. यावेळी त्यांची जीभ घसरला. त्याचाही बच्चू कडू यांनी समाचार घेतला. मासे खाण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांची तशी मानसिकता आहे. त्यामुळे ते तसे बोलले असतील, असं बच्चू कडू म्हणालेत.

खासदार नवणीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्येमध्ये विठ्ठलराव नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली नवनीत राणा यांना धमकीच्या मुद्द्यावर बोलताना ते कोण महत्वाचे आहे का? असा प्रती सवाल करत त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग विभाग आपल्यादारी या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड मध्ये आले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.