AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा ‘बिमार’ होण्यापासून संरक्षण : मोदी

ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा 'बिमार' होण्यापासून संरक्षण : मोदी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 28, 2020 | 5:04 PM
Share

पाटणा : ज्याप्रमाणे मास्क घालून तुम्ही कोव्हिडपासून स्वतःचे संरक्षण करु शकता, त्याप्रमाणे मतदान करुन बिहारला ‘बिमार’ (आजारी) होण्यापासून वाचवू शकता, अशी शाब्दिक कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त पाटण्यातील रॅलीला मोदींनी संबोधित केले. (PM Narendra Modi addresses an election rally in Patna takes jibe on Bihar Bimar)

“गेल्या दीड दशकात बिहारने नितीशजींच्या नेतृत्वात गोंधळापासून सुशासनाकडे वेगाने वाटचाल केली आहे. एनडीए सरकारच्या प्रयत्नांमुळे बिहारने गैरसोयीपासून सोयीसुविधांपर्यंत, अंधकारापासून प्रकाशाकडे, अविश्वासापासून विश्वासापर्यंत, उद्योगांच्या पळवापळवीपासून संधींपर्यंत बराच मोठा टप्पा गाठला आहे.” असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे की बिहारमधील विजेची व्याख्या ही आहे की कनेक्शन नाहीये. कंदील काळातील काळोख आता संपला आहे” असेही मोदींनी पुढे जोडले.

“बिहारमधील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा कोण पूर्ण करु शकेल? ज्यांनी बिहारची लूट केली ते हे करु शकतात? ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला आणि सर्वांवर अन्याय केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही. केवळ एनडीएच हे करु शकते” अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही पाहा : Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे फोटो

“यापूर्वी रुग्णालयात डॉक्टर सापडणे कठीण होते. आता वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्ससारख्या सुविधा येथे आहेत. पूर्वी खेड्यापाड्यात अशी मागणी होती की कशीतरी ही दरी मिटवा, परंतु आता प्रत्येक हंगामात चांगल्या स्थितीत राहणाऱ्या रुंद रस्त्यांची जनतेला अपेक्षा आहे.” असे मोदी म्हणाले.

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसर्‍या टप्प्यातील मतदान तीन नोव्हेंबर, तर तिसर्‍या टप्प्यासाठी सात नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर दहा नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या :

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप

(PM Narendra Modi addresses an election rally in Patna takes jibe on Bihar Bimar)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक