AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात...
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 12, 2020 | 11:01 PM
Share

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत (PM Narendra Modi West Bengal Tour). या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 स्थापना दिनी मोदी म्हणाले, ममता दीदी केंद्राच्या योजनांना लागू करत नाहीत, कारण या योजनांमध्ये त्यांना नाही कट मिळत, नाही सिंडिंकेट काम करत (PM Narendra Modi On Mamata Banerjee).

“ममता सरकारने आयुष्मान भारत आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजना लागू केल्या नाही. मला माहित नाही या योजनांना राज्य सरकार परवानगी देणार की नाही. मात्र, जर ममता सरकारने या योजना लागू केल्या तर लोकांना आरोग्य योजनांशी संबंधित लाभ मिळू शकतील. आम्ही या खासकरुन गरीब, दलित, वंचित, शोषित आणि मागासलेल्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. परंतु बंगालला त्याचा लाभ मिळत नाही, कारण इथल्या सरकारला हे नको आहे.

“आयुष्मान योजनेअंतर्गत 75 लाख लोकांनी लाभ घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील 90 लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. यातही 35 लाखाहून अधिक भगिनी आदिवासी आणि दलित आहेत”, असंही मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता पोर्टचं नाव बदलून श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट करत असल्याचीही घोषणा केली. “कोलकाताचं हे पोर्ट औद्योगिक, अध्यात्मिक आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे. हे पोर्ट आता 150 व्या वर्षात प्रवेश करत आहे, या निमित्ताने याला नवीन भारताच प्रतीक बनवणे गरजेचं आहे. आजच्या या प्रसंगी मी बाबासाहेब आंबेडकरांनाही स्मरण करतो, त्यांना नमन करतो”, असं मोदी म्हणाले.

केंद्राच्या योजनामध्ये नाही मध्यस्थ, नाही सिंडिकेट

ममता बॅनर्जींवर निशाणा साधत मोदी म्हणाले, “शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 43,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. कोणी मध्यस्थ नाही, सिडिंकेट नाही आणि जेव्हा थेट मदत मिळते तेव्हा कट मिळत नाही, सिंडिकेट चालत नाही, मग अशा योजना का लागू करणार. देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना इतकी मोठी मदत, पण बंगालच्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही याचं मला नेहमी दु:ख असेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की धोरण निर्मात्यांनाना देव सद्बुद्धी देवो आणि आजारीपणात गरिबांची मदत करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आणि शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी शेतकरी सम्मान योजनेचा मार्ग मोकळा व्हावा. त्यांना याचा लाभ मिळावा. ”

PM Narendra Modi On Mamata Banerjee

Follow Us
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!