AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात...
| Updated on: Jan 12, 2020 | 11:01 PM
Share

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत (PM Narendra Modi West Bengal Tour). या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 स्थापना दिनी मोदी म्हणाले, ममता दीदी केंद्राच्या योजनांना लागू करत नाहीत, कारण या योजनांमध्ये त्यांना नाही कट मिळत, नाही सिंडिंकेट काम करत (PM Narendra Modi On Mamata Banerjee).

“ममता सरकारने आयुष्मान भारत आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजना लागू केल्या नाही. मला माहित नाही या योजनांना राज्य सरकार परवानगी देणार की नाही. मात्र, जर ममता सरकारने या योजना लागू केल्या तर लोकांना आरोग्य योजनांशी संबंधित लाभ मिळू शकतील. आम्ही या खासकरुन गरीब, दलित, वंचित, शोषित आणि मागासलेल्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. परंतु बंगालला त्याचा लाभ मिळत नाही, कारण इथल्या सरकारला हे नको आहे.

“आयुष्मान योजनेअंतर्गत 75 लाख लोकांनी लाभ घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील 90 लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. यातही 35 लाखाहून अधिक भगिनी आदिवासी आणि दलित आहेत”, असंही मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता पोर्टचं नाव बदलून श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट करत असल्याचीही घोषणा केली. “कोलकाताचं हे पोर्ट औद्योगिक, अध्यात्मिक आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे. हे पोर्ट आता 150 व्या वर्षात प्रवेश करत आहे, या निमित्ताने याला नवीन भारताच प्रतीक बनवणे गरजेचं आहे. आजच्या या प्रसंगी मी बाबासाहेब आंबेडकरांनाही स्मरण करतो, त्यांना नमन करतो”, असं मोदी म्हणाले.

केंद्राच्या योजनामध्ये नाही मध्यस्थ, नाही सिंडिकेट

ममता बॅनर्जींवर निशाणा साधत मोदी म्हणाले, “शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 43,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. कोणी मध्यस्थ नाही, सिडिंकेट नाही आणि जेव्हा थेट मदत मिळते तेव्हा कट मिळत नाही, सिंडिकेट चालत नाही, मग अशा योजना का लागू करणार. देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना इतकी मोठी मदत, पण बंगालच्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही याचं मला नेहमी दु:ख असेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की धोरण निर्मात्यांनाना देव सद्बुद्धी देवो आणि आजारीपणात गरिबांची मदत करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आणि शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी शेतकरी सम्मान योजनेचा मार्ग मोकळा व्हावा. त्यांना याचा लाभ मिळावा. ”

PM Narendra Modi On Mamata Banerjee

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.