AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हाच राज ठाकरेंना भेटणार, नाराजी दूर होताच महाजनांची भूमिका; काय म्हणाले?

प्रकाश महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले आहे. त्यांची नुकतीच अमित ठाकरे यांच्याोसबत बैठक झाली आहे.

तेव्हाच राज ठाकरेंना भेटणार, नाराजी दूर होताच महाजनांची भूमिका; काय म्हणाले?
prakash mahajan
| Updated on: Jul 17, 2025 | 3:33 PM
Share

Prakash Mahajan : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या पक्षाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांना नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीनंतर मात्र पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर आता महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले आहे. संतापाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी घडल्या, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

प्रकाश महाजन यांच्या नाराजीचे वृत्त समोर आल्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी महाजन यांना कॉल केला होत. या दोन नेत्यांवर नाराजीच्या विषयावर चर्चा झाली होती. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशीही महाजन यांची चर्चा झाली होती. आज पुन्हा अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यात बैठकही झाली आहे. या बैठकीनंतर आता महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले.

महाजन नेमकं काय म्हणाले?

आमच्यात नेमकी काय चर्चा झाली आहे, त्याचा तपशील मी सांगणार नाही. मात्र माझ्याकडून काही गोष्टी संतापाच्या भरात घडल्या. आता सगळं सुरळीत चाललं आहे. त्यांनी मला पक्षाचं काम करायला सांगितलंय. अमित ठाकरे माझ्या कायमच संपर्कात असतात. मी त्यांना काही गोष्टी बोललो आहे. त्या बाबींवर हळूहळू तोडगा निघेल, असे यावेळी प्रकाश महाजन यांनी सांगितले.

राज ठाकरे बोलवतील त्या दिवशी भेटणार

त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयीही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे साहेबांसोबत माझी चर्चा झाली नाही. मला राज ठाकरे जेव्हा बोलवतील त्या दिवशी मी त्यांना भेटणार. माझे मत अमित ठाकरे राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मी मनसेच कायम सक्रिय असेल, अशी खात्रीही त्यांनी यावेळी दिली.

महाजन यांची नेमकी नाराजी काय होती?

नाशिकच्या इगतपुरी येथे मनसेचे तीन दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. खुद्द राज ठाकरे हेदेखील या शिबिराला उपस्थित राहिले होते. या शिबिरात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर कोणाही काहीही बोलू नका. मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करेन, असे यावेळी राज ठाकरे यांनी आदेश दिले होते. तसेच पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र या महत्त्वाच्या शिबिराला प्रकाश महाजन यांना बोलवण्यात आले नव्हते. यावरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मी घरी काय तोंड दाखवू. माझ्या पक्षात आज दिवाळी सुरू आहे आणि माझ्या घरात अंधार आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच यावेळी नारायण राणे प्रकरणात पक्षाने मला साथ दिल नाही. पण मी ते विसरलो, असेही महाजन म्हणाले होते. आता मात्र त्यांची नाराजी दूर झाली आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.