AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीयता, धर्मांधतेचं विष पेरलं जातंय; देशाच्या विभाजनाचा डाव…, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे.

जातीयता, धर्मांधतेचं विष पेरलं जातंय; देशाच्या विभाजनाचा डाव..., पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल
Image Credit source: Google
| Updated on: Oct 26, 2022 | 2:10 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोदी (Modi) सरकारवर घणाघात केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मोदी सरकार देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरतंय असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आम्ही विरोधीपक्षात आहोत मग आम्ही मोदीचं कौतुक का करायचं असा सवालही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे

नेमकं काय म्हटलं चव्हाण यांनी?

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा देशाचे विभाजन करण्याचा डाव आहे. केंद्र सरकारकडून देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरलं जात आहे. आम्ही विरोधी पक्षात मग मोदीचं कौतुक का करायचं? मी टीका करत राहीन भाजपाने उत्तर द्यावं असं पृथ्वीराज  चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करणार आहेत यावरून देखील टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत, सोबत अयोध्येला पण जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, राज्याचा दौरा केला पाहिजे. राज्यातील जनेतची दु:ख समजून घेतली पाहिजेत. राज्यात ओला दुष्काळ आहे, मदत केली पाहिजे. राज्यात जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरत असतील तर चांगली गोष्ट आहे.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.