AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो; शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

Sharad Pawar on CM Eknath Shinde : भर पावसात एकनाथ शिंदे यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी; शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा, म्हणाले...

कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो; शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला
| Updated on: Jun 26, 2023 | 1:17 PM
Share

बारामती : यंदाच्या मौसमातील पहिल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली. या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड आणि मिलन सबवे परिसरात भेट देत आढावा घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं याबाबत प्रश्न विचारला असता, कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

BRS पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय होत आहे. त्यावर त्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, याची चिंता नाही. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर सेवा करायची असेल तर त्यांच्या स्वागत आहे. ते काय करत आहेत, लोक त्याला कसा प्रतिसाद देतील हे निवडणुकीनंतर दिसून येईलच, असं पवार म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पटनामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हा सगळ्या विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये कुठेही पंतप्रधानपदाची चर्चा झालेली नाही. या बैठकीमध्ये चर्चा ही महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर चर्चा झाली. काही ठिकाणी सांप्रदायिक शक्ती वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय आणि समाज समाजामध्ये अंतर निर्माण पाडलं जात आहे. यामुळे कोणत्याही राज्यामध्ये समाज विभाग प्रवृत्ती वाढत असतील तर यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी चर्चा विरोधी पक्षाच्या बैठकीत झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं.

सिद्धरामय्या यांनी जे कर्नाटकमधील महिलांसाठी ज्या योजना राबवल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी इथेही करावी असं त्यांनी सांगितलं आहे, असं शरद पवार म्हणालेत.

पाऊस आणि शेती

गेल्या पाच सहा दिवसांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये फरक आहे. चार-पाच दिवसांपूर्वी अतिशय चिंतेचे वातावरण राज्यात होतं गेल्या दोन दिवसात हवामानात बदल दिसतोय त्यामुळे कुठे ना कुठेतरी पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याचे आव्हान आहे चार ते पाच दिवसाचे शेतीसाठी हे वातावरण पोषक आहे हवामान खात्याचा गेले अनेक वर्षाचा अनुभव आहे, असं म्हणत शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.