AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो; शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

Sharad Pawar on CM Eknath Shinde : भर पावसात एकनाथ शिंदे यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी; शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा, म्हणाले...

कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो; शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 26, 2023 | 1:17 PM
Share

बारामती : यंदाच्या मौसमातील पहिल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली. या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड आणि मिलन सबवे परिसरात भेट देत आढावा घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं याबाबत प्रश्न विचारला असता, कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

BRS पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय होत आहे. त्यावर त्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, याची चिंता नाही. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर सेवा करायची असेल तर त्यांच्या स्वागत आहे. ते काय करत आहेत, लोक त्याला कसा प्रतिसाद देतील हे निवडणुकीनंतर दिसून येईलच, असं पवार म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पटनामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हा सगळ्या विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये कुठेही पंतप्रधानपदाची चर्चा झालेली नाही. या बैठकीमध्ये चर्चा ही महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर चर्चा झाली. काही ठिकाणी सांप्रदायिक शक्ती वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय आणि समाज समाजामध्ये अंतर निर्माण पाडलं जात आहे. यामुळे कोणत्याही राज्यामध्ये समाज विभाग प्रवृत्ती वाढत असतील तर यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी चर्चा विरोधी पक्षाच्या बैठकीत झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं.

सिद्धरामय्या यांनी जे कर्नाटकमधील महिलांसाठी ज्या योजना राबवल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी इथेही करावी असं त्यांनी सांगितलं आहे, असं शरद पवार म्हणालेत.

पाऊस आणि शेती

गेल्या पाच सहा दिवसांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये फरक आहे. चार-पाच दिवसांपूर्वी अतिशय चिंतेचे वातावरण राज्यात होतं गेल्या दोन दिवसात हवामानात बदल दिसतोय त्यामुळे कुठे ना कुठेतरी पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याचे आव्हान आहे चार ते पाच दिवसाचे शेतीसाठी हे वातावरण पोषक आहे हवामान खात्याचा गेले अनेक वर्षाचा अनुभव आहे, असं म्हणत शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...