AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi मणिपूरवरुन पायी चालत येणार मुंबईत, शरद पवार-उद्धव ठाकरे सहभागी होऊन साथ देणार का?

काँग्रेसच्या 'भारत न्याय यात्रेला' 14 जानेवारीपासून सुरुवात होईल. राहुल गांधी यावेळी मणिपूरहून मुंबईपर्यंत चालत येणार आहेत. हा यात्रामार्ग एकूण 6200 किलोमीटरचा आहे. एकूण 14 राज्यातून ही यात्रा जाईल. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी माहिती दिलीय.

Rahul Gandhi मणिपूरवरुन पायी चालत येणार मुंबईत, शरद पवार-उद्धव ठाकरे सहभागी होऊन साथ देणार का?
Rahul Gandhi
| Updated on: Dec 27, 2023 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारीपासून सुरु होणार आहे. राहुल गांधी यावेळी मणिपूर ते मुंबई यात्रा करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी बुधवारी ही माहिती दिली. राहुल गांधी यांचा यात्रामार्ग 6200 किलोमीटरचा असणार आहे. 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत ‘भारत न्याय यात्रा’ चालेल. काँग्रेसची ही न्याय यात्रा एकूण 14 राज्यातून जाईल.

काँग्रेसची ही ‘भारत न्याय यात्रा’ 14 राज्य आणि 85 जिल्ह्यांमधून जाणार आहे. मणिपुर, नागालैंड, असम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, यूपी, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र मुंबईत येणार आहे. यात्रामार्ग मोठा आहे. काही ठिकाणी बसने तर काही ठिकाणी पायी प्रवास होईल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘भारत न्याय यात्रेला’ हिरवा झेंडा दाखवतील.

मणिपूरमधून यात्रेची सुरुवात का?

“मणिपूर देशाचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही तिथल्या लोकांच्या जखमेला मलम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही काही राजकीय यात्रा नाही. जे पीडित आहेत, त्या सर्वसामान्य लोकांसाठी ही यात्रा आहे म्हणून मणिपूरमधून यात्रेची सुरुवात होईल” असं काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितलं.

यात्रेचा हेतू-उद्देश काय?

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की, ‘भारत जोड़ो यात्रा’ भारताला जोडण्यासाठी होती. आता ‘भारत न्याय यात्रा’ असेल. भारत जोड़ो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मुद्दे उपस्थित केले होते. आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही. आता भारत न्याय यात्रेचा मुद्दा आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय आहे”

शरद पवार सहभागी होणार का?

राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रेचा’ समारोप मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी त्यांच्या ‘भारत जोड़ो यात्रेत’ आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आता राहुल यांची यात्रा मुंबईत येईल, तेव्हा त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होतील का? सध्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरत नाहीय.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय