AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राजीव, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काय केलं ते वारंवार सांगत बसू नका, तर ‘या’ मुद्द्यावर बोला”

महात्मा गांधीशी होणाऱ्या तुलनेवर राहुल गांधी स्पष्टच बोलले...

राजीव, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काय केलं ते वारंवार सांगत बसू नका, तर 'या' मुद्द्यावर बोला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 15, 2022 | 8:32 AM
Share

मुंबई : “देशाच्या दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी महान काम केलं. त्यांनी जे काम केलं ते चांगलं होतं. आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. पण प्रत्येक सभेत त्यांनी काय-काय केलं ते लोकांना वारंवार सांगत बसू नका. तर आता आपण लोकांसाठी काय करू शकतो. आपल्या योजना काय आहेत.याविषयी लोकांशी बोला त्यांच्या मनात विश्वास निर्माण करा”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानमध्ये आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

महात्मा गांधी यांचं देशाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. त्या जागी मी कधीही जाऊ शकत नाही. गांधीजी आणि माझी तुलना कधीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासाठी आयुष्य वाहिलं. अनेक वर्षे तुरुंगात घालवली. त्यांनी जे देशासाठी केलं त्याची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हा दोघांची तुलना कुणीही करता कामा नये, असं राहुल गांधी म्हणालेत.

काँग्रेसच्या एका नेत्याने भारत जोडो यात्रेतील राजस्थानच्या सभेत बोलताना गांधीजींची तुलना राहुल गांधीशी केली. त्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले. तेव्हा त्यांनी अशी तुलना केली जाऊ नये, असं आवाहन केलं.

View this post on Instagram

A post shared by Congress (@incindia)

‘जय सियाराम’ म्हणण्याची राजस्थानमधील संस्कृती आहे. आरएसएसचे लोक ‘जय श्रीराम’ म्हणतात. त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ‘जय सियाराम’ का नाही म्हणत? ते सितामाईचा अपमान का करतात. त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही ‘जय सियाराम’ म्हणा. ते भारतातील महिलांचा सन्मान करत नाहीत. यांच्या संघटनेत एकही महिला नाही. ते महिलांना अपमानित करतात. ते जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना याविषयी प्रश्न विचारा, असं राहुल गांधी म्हणालेत.

View this post on Instagram

A post shared by Congress (@incindia)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....