राज ठाकरे औरंगाबादनंतर नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?

| Updated on: Apr 30, 2022 | 8:00 AM

राज ठाकरे एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सभेनंतर दोन मेला ते नाशिक दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे औरंगाबादनंतर नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?
राज ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई :  एक मे रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा आहे. या सभेनंतर मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे हे दोन तारखेला नाशिकला  जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादचा दौरा आटपून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे आपल्या या दौऱ्यात मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता आहे. अनंता सूर्यवंशी यांचे निधन झाले आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सूर्यवंशी  यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राज ठाकरे नाशिक मार्गे मुंबईला रवाना होतील. दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादला दाखल होणार आहेत. उद्या राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेपूर्वी ते आज मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, तसेच सभेच्या तयारीचा देखील आढावा घेणार आहेत.

औरंगाबादमध्ये मनसेची जय्यत तयारी

उद्या एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी मिळणार की नाही असा देखील प्रश्न होता. मात्र औरंगाबाद पोलिसांकडून काही अटींसह राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत असून, सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

राज ठाकरे काय बोलणार?

राज्या ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या दोनही सभेत भोंग्याचा आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या पहिल्या दोन सभेनंतर राजकारण चांगलेच तापले असून, आरोप,प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.