AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: नामांतराचा निर्णय आताच का?, अडीच वर्ष काय करत होतात; औरंगाबादच्या नामांतरावरून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र आता या प्रस्तावावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray: नामांतराचा निर्णय आताच का?, अडीच वर्ष काय करत होतात; औरंगाबादच्या नामांतरावरून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे, राज ठाकरेImage Credit source: TV9
| Updated on: Jun 30, 2022 | 8:05 AM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. नामांतराचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गेली अडीच वर्ष सत्ता होती. मग आताच का नामांतराचा निर्णय घेण्यात आला. आताच का नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या नामांतराच्या प्रस्तावामागे सरकारचा हेतू काय हे कोणापासूनही लपून नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जे काम आपले नाहीच, ते काम आपण केले असे सांगण्यात काय हशील अशा शद्बात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारव टीका केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

ज्या ठिकाणी उच्च न्यायालय, विमानतळ, विभागीय कार्यालये, रेल्वेचे मुख्य कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफीस अशी विविध महत्त्वाची प्रशासकीय कार्यालय असतात. त्या शहराची नावे राज्य सरकारला बदलण्याचा अधिकार नसतो. अशा शहरांची नावे केवळ केंद्र सरकारच बदलू शकते, आजपर्यंत जेवढ्या मोठ्या शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ती केंद्रानेच बदलली आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास बॉम्बेचे मुंबई, मद्रासचे चेन्नई, अलाहाबादचे प्रयागराज ही सर्व नावे बदलताना त्यावर केंद्राने शिक्कामोर्तब केल्यानंतरच ही नावे बदलण्यात आली. मुळात राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला तो निर्णय नसून एक प्रस्ताव आहे. आता हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवाा लागेल, त्यानंतर केंद्र त्यावर निर्णय घेईल. मात्र गेल्या अडीच वर्षांमध्ये हा निर्णय घेतला गेला नाही. मग आजच या निर्णयाची गरज का लागली. त्यामागे कोणता हेतू होता. हे कोणापासूनही लपून राहिले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे.

औरंगाबादच्या नामांतर प्रस्तावाला मंजुरी

उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी बुधवारी रात्रीच राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मात्र राजीनाम्यापूर्वी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे करण्यात यावे, तसेच उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात यावे अशी मागली गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर उद्धव ठाकरे सरकारने या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र आता यावरून उद्धव ठाकरे सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.