AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये पवारांच्या सभेत राज ठाकरेंचे पोस्टर झळकले

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक येथील सभास्थळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पोस्टरवरुन गायब असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर मात्र सभेच्या प्रवेशद्वारावर लावलेले दिसले. शरद पवार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी  नाशिकमधील सैय्यद पिंपरी गावात आले होते. सभेच्या ठिकाणी मंचावर लावण्यात […]

नाशिकमध्ये पवारांच्या सभेत राज ठाकरेंचे पोस्टर झळकले
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक येथील सभास्थळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पोस्टरवरुन गायब असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर मात्र सभेच्या प्रवेशद्वारावर लावलेले दिसले. शरद पवार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी  नाशिकमधील सैय्यद पिंपरी गावात आले होते.

सभेच्या ठिकाणी मंचावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर विखे पाटील यांच्या फोटोला स्थान न मिळाल्याने उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा झाली. मात्र याठिकाणी मनसेचे अस्तित्व ठळकपणे पाहायला मिळाले. अगदी प्रवेशद्वारावरच राज ठाकरेंच्या पोस्टरसह मनसेचे झेंडे लावण्यात आले होते. सैय्यद पिंपरी परिसर तसा शिवसेनेचा गड मानला जातो. अशा भागात सभा घेऊनही सभेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, सभेत शरद पवार यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत. असे असतानाही मोदींना मात्र माझ्या कुटुंबाची चिंता लागली आहे, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला.

‘शेतकऱ्यांना पैसा मिळू नये हीच मोदी सरकारची मानसिकता’

आपल्या भाषणात शरद पवार यांनी शेतीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांद्याचे भाव वाढले, तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात. मात्र, संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारच्या काळात कांदा महागला म्हणून भाजपने आंदोलने केली होती. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये, हीच मोदी सरकारची मानसिकता आहे. म्हणूनच कांद्याचे भाव पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच चमत्कार करू शकते.

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा’

पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवल्याच्या दाव्याचा समाचार घेताना पवार यांनी मोदी सरकारचा दावा खोटा असल्याचे म्हटले. तसेच शेती मालाच्या भावात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचेही नमूद केले. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी. गहू आणि तांदूळ दरात या सरकारने अत्यल्प वाढ केली. आघाडी सरकारच्या तुलनेत सर्वच शेतीमाल उत्पादनांच्या दरात मोदी सरकारने अत्यल्प वाढ केली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचे पवार म्हणाले.

कारवाई लष्करानं केली, मात्र 56 इंच छाती मोदी फुलवत आहे

मोदींच्या सभांमध्ये होणाऱ्या सैन्याच्या उल्लेखावर बोलताना पवार म्हणाले, ‘मोदी प्रत्येक ठिकाणी पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचे सांगतात. ही कारवाई लष्कराने केली, मात्र 56 इंच छाती कोण फुलवतंय तर मोदी.’ अभिनंदनला सोडवले यासाठी सरकारचे अभिनंदन करताना कुलभूषणला का सोडले नाही, असाही प्रश्न पवार यांनी विचारला. तसेच हेलिकॉप्टर पडल्याने शहीद झालेल्या मांडवगणे यांच्या कुटुंबीयांनीही सरकारला याचा राजकीय फायदा न घेण्याचा सल्ला दिल्याची आठवण पवार यांनी करुन दिली.

पाहा व्हिडीओ:

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...