AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election: उच्च न्यायालय अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानाची परवानगी देणार? आज ठरणार!

Rajya Sabha Election 2022 : जर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयानेही मतदानाची परवानगी दिली नाही, तर राज्यसभा निवडणुकीसाठीचं गणित बदलणार आहे.

Rajya Sabha Election: उच्च न्यायालय अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानाची परवानगी देणार? आज ठरणार!
नवाब मलिक, अनिल देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2022 | 6:25 AM
Share

मुंबई : आज राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election News) मतदान पार पडणार आहे. मात्र या मतदानासाठीचा अधिकार नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मिळणार का, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. याप्रकरणी गुरुवारी पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. पीएमएलने न्यायालयानं मतदानासाठी कारागृहाबाहेर जाण्यास अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना परवानगी नाकारली. त्यामुळे आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. यावेळी उच्च न्यायालया अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार देतं का?, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपचंही लक्ष लागलंय.

गुरुवारी काय झालं होतं?

नवाब मलिक आणि अनिलक देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानदी द्या, अशी मागणी विशेष पीएमएलए न्यायालयात केली होती. त्यावर गुरुवारी निर्णय झाला. पीएमएलए न्यायालयानं मतदानासाठी परवानगी देण्यास नकार दिला. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचं सांगत ईडीने मलिक आणि देशमुख यांच्या तात्पुरत्या जामिनाला विरोधदेखील केली होता.

..तर गणित काय असेल?

जर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयानेही मतदानाची परवानगी दिली नाही, तर राज्यसभा निवडणुकीसाठीचं गणित बदलणार आहे. राज्यसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटाही बदलेल. पहिल्या फेरीत विजयी होण्यासाठी राज्यसभा उमेदवाराला 40.71 मतांची, म्हणजेच 41 आमदारांची पहिल्या पसंतीची मतं प्राप्त करणं आवश्यक असणार आहेत. दरम्यान, आधी 42 आमदारांची मतं मिळवण्याची गरज भासणार होती.

थोडक्यात पण महत्त्वाचं….

  1. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकूण 6 जाग
  2. सहा जागांसाआठी सात उमेदवार रिंगणात
  3. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापढी, पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे – यांचा विजय जवळपास निश्चित असल्याची माहिती
  4. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्या थेट लढत

कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत?

  1. शिवसेना 55
  2. राष्ट्रवादी 53
  3. काँग्रेस 44
  4. भाजप 106
  5. छोटे पक्ष 16
  6. अपक्ष 13
  7. बविआ 3
  8. सपा 2
  9. एमआयएम 2
  10. प्रहार जनशक्ती 2
  11. मनसे 1
  12. माकप 1
  13. स्वाभिमानी 1
  14. रासप 1
  15. जनसुराज्य 1
  16. शेकाप 1
  17. क्रांतिकारी शेतकरी 1
  18. एकूण – 16
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.