AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. भाजपच्या एका बड्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

...तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा
| Updated on: Sep 22, 2022 | 10:41 PM
Share

अभिजीत पोते, पुणे : शरद पवार यांच्या पुढाकराने महाराष्ट्रात इतिहासात घडला. शिवसेना आणि काँग्रेस दोन वेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर (Eknath Shinde) हे सरकार पडलं. हे सरकार कश्यामुळे पडलं यासाठी विविध तर्क लावले जात आहेत. कुणी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दोष देतंय, तर कुणी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणतंय. अश्यात भाजपच्या एका बड्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं. पण एका गोष्टीमुळे सरकार पडलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मीडियासमोर आले असते तरी सरकार पडलं नसतं, असा दावा राम शिंदेंनी केलाय.

राम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ठाकरेंचं संतुलन बिघडलं आहे, असं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे निराशेतून विधानं करतात. त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच मंत्रालयात गेले नाहीत. संघटनेची बैठक घेतली नाही. आता सरकार पडल्यानंतर ते खडबडून जागे झाले आहेत. बैठका घ्यायला लागलेत, असं शिंदे म्हणालेत.

ठाकरेंवर टीका करताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस के घोडे आहेत, असं राम शिंदे म्हणालेत.

राम शिंदे हे भाजपच्या वरच्या फळीतील नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. त्याच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.