AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले, सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवरती जोरदार टीका

बग्गा यांची आत्तापर्यंतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. बग्गा यांनी विरोधकांवरती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत अनेकांवर हल्ले केले आहेत.

Saamana : भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले, सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवरती जोरदार टीका
भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागलेImage Credit source: twitter
| Updated on: May 09, 2022 | 7:27 AM
Share

मुंबई – लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. पोलिसांचा व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर कोण करत आहे. हे देशाची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही झुंडशाही, मनमानी केली तरी केंद्र सरकारचे पोलीस (Central Government Police) त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून आरोपींना पळवून लावतात. बग्गा यांना अटक करून पंजाबात नेऊ नये म्हणून भाजपशासित राज्यांनी पंजाब पोलिसांची (Punjab Police) अड़वणूक केली आहे. तसेच त्यांची बेकायदेशीर पद्वतीने सुटका करून पळवून लावले. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात. या प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील. तोपर्यंत देश अखंड राहील काय ? असा सवाल आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखात उपस्थित केला आहे.

सत्तेची फार खतरनाक असते

सत्तेची फार खतरनाक असते. त्या नशेने आत्तापर्यंत अनेकांना बरबाद केले आहे. त्यामुळे लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. दिल्लीतल्या भाजप नेत्याला दिल्ली पंजाब पोलिसांनी अटक केली. त्यावेळी केंद्र सरकारकडून त्याला वाचवत असल्याचं एक भलतंचं नाट्या पाहायला मिळालं. भाजपच्या तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी पकडणं म्हणजे हुकुमशाही असल्याचं भाजपचे नेते ओरडून सांगत आहेत. पंजाब पोलिसांच्या कृतीने भाजपाच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे अशी चिंता भाजप पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भाजपची भूमिका म्हणजे करून भागले आणि देवपूजेला लागले अशी आहे.

खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

बग्गा यांची आत्तापर्यंतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. बग्गा यांनी विरोधकांवरती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत अनेकांवर हल्ले केले आहेत. दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा भाषेचा वापर करून कार्यकर्त्यांना भडकवले आहे. केजरीवालांना जीवंत सोडणार नाही अशा पध्दतीची भाषा त्यांनी वापरली आहे. त्यावर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करून बग्गाला अटक केली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी त्या प्रकरणात हस्तक्षेप करून बग्गा याची सुटका केली आहे. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात अशी टीका करण्यात आली आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.