AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कश्यासाठी? सामनातून कारण सांगितलं…

आजच्या सामानातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कश्यासाठी? सामनातून कारण सांगितलं...
| Updated on: Sep 13, 2022 | 9:41 AM
Share

मुंबई : आजच्या सामानाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सांगण्यात आलं आहे. राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ , ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठी असल्याचं सामनात म्हणण्यात आलं आहे. “देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व ‘ भारत जोडो ‘ यात्रा (Bharat Jodo Yatra)अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे . राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ , ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठीच आहे . त्यांनी पाच हजाराचे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय , फरक पडत नाही . राहुलवरील टीका भाजपास मात्र उघडे पाडीत आहे . ‘ कर्तव्यपथा ‘ वरील पोटदुखीने काय साध्य होणार!”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजप प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे, असं म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ पदयात्रेत जे ‘टी शर्ट’ वापरत आहेत त्याची किंमत 41 हजार रुपये असल्याची माहिती भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार? राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे, असं म्हणत काँग्रेसच्या मोहिमेला सामनातून पाठिंबा देण्यात आला आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.