AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य, अग्रलेखात नेमकं काय? वाचा….

सामनाच्या आजच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे.

26/11 च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य, अग्रलेखात नेमकं काय? वाचा....
तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2022 | 8:02 AM
Share

मुंबई : आज 26/11. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस. याचपार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर (Northeast Violence )भाष्य करण्यात आलं आहे. “ईशान्य हिंदुस्थान आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे अशांत आहे. त्यात तेथील सीमावादांचे ‘ज्वालामुखी ‘ धगधगत राहिले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच घातक ठरेल . ईशान्येचा विकास आपल्याच राजवटीत झाला , तेथील शांततेसाठी जेवढे प्रयत्न मागील सात – आठ वर्षांत झाले तेवढे पूर्वी झाले नाहीत , असा दावा केंद्रातील विद्यमान सरकार नेहमीच करीत असते . आसाम आणि मेघालय सीमेवर मंगळवारी झालेल्या हिंसाचाराने या फुग्याला टाचणी लावली आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

“गेल्या वर्षी आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यात आसाम पोलिसांचे सहा जवान ठार झाले होते. आता आसाम-मेघालय सीमावादाचा हिंसक उद्रेक झाला आणि आसामच्या एका वन कर्मचाऱ्यासह सहा नागरिकांचा बळी गेला. आसाम आणि मेघालय यांच्यातील 12 पैकी 6 वादग्रस्त मुद्दय़ांवर परस्पर समझोता होऊनही आणि उर्वरित मुद्दय़ांबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही मंगळवारचा रक्तरंजित हिंसाचार कसा घडला? तो घडला की घडवला गेला? गोळीबार आवश्यक होता की अनावश्यक?”, असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही सध्या वातावरण पेटलेलेच आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आगलावेपणा आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारची बोटचेपी भूमिका यामुळे मराठी सीमाबांधव आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेत तीव्र संतापाची भावना आहे. हेच तिकडे आसाम आणि मेघालयासह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानातही घडत आहे. मागील काही वर्षांतील आसाम राज्याचे आक्रमक धोरण ईशान्येतील सीमावादासंदर्भात वादग्रस्त ठरले आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.