AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य, अग्रलेखात नेमकं काय? वाचा….

सामनाच्या आजच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे.

26/11 च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य, अग्रलेखात नेमकं काय? वाचा....
तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप Image Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 26, 2022 | 8:02 AM
Share

मुंबई : आज 26/11. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस. याचपार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर (Northeast Violence )भाष्य करण्यात आलं आहे. “ईशान्य हिंदुस्थान आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे अशांत आहे. त्यात तेथील सीमावादांचे ‘ज्वालामुखी ‘ धगधगत राहिले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच घातक ठरेल . ईशान्येचा विकास आपल्याच राजवटीत झाला , तेथील शांततेसाठी जेवढे प्रयत्न मागील सात – आठ वर्षांत झाले तेवढे पूर्वी झाले नाहीत , असा दावा केंद्रातील विद्यमान सरकार नेहमीच करीत असते . आसाम आणि मेघालय सीमेवर मंगळवारी झालेल्या हिंसाचाराने या फुग्याला टाचणी लावली आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

“गेल्या वर्षी आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यात आसाम पोलिसांचे सहा जवान ठार झाले होते. आता आसाम-मेघालय सीमावादाचा हिंसक उद्रेक झाला आणि आसामच्या एका वन कर्मचाऱ्यासह सहा नागरिकांचा बळी गेला. आसाम आणि मेघालय यांच्यातील 12 पैकी 6 वादग्रस्त मुद्दय़ांवर परस्पर समझोता होऊनही आणि उर्वरित मुद्दय़ांबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही मंगळवारचा रक्तरंजित हिंसाचार कसा घडला? तो घडला की घडवला गेला? गोळीबार आवश्यक होता की अनावश्यक?”, असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही सध्या वातावरण पेटलेलेच आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आगलावेपणा आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारची बोटचेपी भूमिका यामुळे मराठी सीमाबांधव आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेत तीव्र संतापाची भावना आहे. हेच तिकडे आसाम आणि मेघालयासह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानातही घडत आहे. मागील काही वर्षांतील आसाम राज्याचे आक्रमक धोरण ईशान्येतील सीमावादासंदर्भात वादग्रस्त ठरले आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा