AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्शीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्शीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध
| Updated on: Jun 26, 2019 | 3:49 PM
Share

मुंबई : टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगवी जर्सी घालून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या जर्शीचे रंग सारखेच असल्याने भारतीय संघाकडे भगव्या जर्सीचा पर्याय आहे. मात्र त्याला अबू आझमी यांनी आक्षेप घेतला आहे.

“मोदींना संपूर्ण देशाचं भगवीकरण करायचं आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवायला हवं की तिरंग्यामध्ये मुस्लिमांचा हिरवा रंगही आहे. अन्य रंगही तिरंग्यात आहेत, मग जर्सीसाठी केवळ भगव्या रंगालाच पसंती का? भारतीय संघाची जर्शी जर तिरंग्यात असेल तर ते उत्तम ठरेल”, असं अबू आझमी म्हणाले.

अबू आझमींचा हल्लाबोल

मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाचा विकास नाही, बेरोजगारी वाढत आहे. डॉलरचा भाव वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला भगवा रंग दिला जात आहे.  त्याला तिरंग्याचा रंग द्यावयाला हवा, असं अबू आझमींनी नमूद केलं.

मुस्लिम कब्रस्तानावरुन वाद

नवी मंबई घणसोली येथील मुस्लिम कब्रस्तानात मुस्लिम बांधव त्यांच्या नातेवाईकांचा दफनविधी करण्यासाठी गेले असता, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी दफनविधी करण्यास विरोध केल्याचं अबू आझमी म्हणाले.

“ही कब्रस्तानाची जागा शासनाने 11 वर्षापूर्वी मुस्लिम समाजाला दिली आहे. पण ज्यांच्या डोळ्यात मुसलमान खुपतो, अशा मुस्लिमविरोधी समाजकंटकांनी  कब्रस्तानात घुसून दफन करण्यास मनाई केली. इतकंच नाही तर मुसलमान पाकिस्तान मे चले जाव ! यहा दफनाने नही देंगे! अशा घोषणाही दिल्या. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करुन शांतता निर्माण केली”, असं अबू आझमी म्हणाले.

ही मुसलमान समाजाबाबत असलेली व्देषभावना आहे. यामुळे देशाची शांतता भंग केली जात आहे. आज विधानसभा सभागृहात मी औचित्याच्या मुद्याव्दारे हा प्रश्न उपस्थित केला, असं अबू आझमींनी सांगितलं.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सरकारने 11 वर्षापूर्वीच जागा दिली असतानाही आता दफनविधी करण्यास विरोध का ? या ठिकाणी पूर्वी मंदिर होते असा स्थानिकांचा दावा आहे. मग या गोष्टीचा विचार सरकारने जागा देताना का केला नाही? 11 वर्षापूर्वी स्थानिकांनी याला विरोध का केला नाही. या सर्वांचे भान ठेवून मुस्लिम समाजाला दफनविधी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

संबंधित बातम्या 

World Cup 2019 : ‘मेन इन ब्लू’ आता भगव्या रंगात?  

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...