AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या तोंडाला कुलूप का? शिंदेंना निशाणीच कुलूप द्या, सीमाप्रश्नावरून संजय राऊत आक्रमक

तुमच्यात हिंमत असेल तर बोलवा तुमच्या महाशक्तीला. आणि सीमावर्ती भागाला केंद्रशासित भागाचा दर्जा द्या, असं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या तोंडाला कुलूप का? शिंदेंना निशाणीच कुलूप द्या, सीमाप्रश्नावरून संजय राऊत आक्रमक
Image Credit source: social media
| Updated on: Dec 07, 2022 | 10:53 AM
Share

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला असून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि उपमुख्यमंत्री तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला ढाल तलवार ऐवजी कुलूप हीच निशाणी दिली पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्रात भाजप सरकार आहे. महाराष्ट्रातही शिंदे गट आणि भाजपचे सरकार असताना केंद्र सरकारकडून सीमा प्रश्नी हस्तक्षेप का होत नाहीये? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. त्यात आता कर्नाटक सरकार सोलापूर-सांगली या महाराष्ट्राच्या जागेवर दावा सांगत आहे..

कधी नव्हे ते डांग, उमरगाव हे गुजरातचं नाव घेत आहेत… मुंबईवरतीही हल्ला सुरुच आहे.. महाराष्ट्राचे असे तुकडे करण्यासाठी ठाकरे सरकार पाडलं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना ढाल तलवार ऐवजी कुलूप ही निशाणी मिळायला पाहिजे होती. यांच्या तोंडाला कुलूप आहे. हे सरकार तंत्र-मंत्रात अडकलं आहे.

या सरकारला महाराष्ट्राविषयी अभिमान नाही. सरकार टेंडर भरून दिल्लीला आलं आहे. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे…असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय.

महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. काल शरद पवार यांनीही सांगितलं. संयमाचा कडेलोट झाला तर आम्ही बेळगावात जायला तयार आहोत..

बेळगावच्या लढ्यासाठी दिग्गजांनी आयुष्य वेचलंय. आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलंय? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा.. हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला तर त्यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील.. असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

तुमच्यात हिंमत असेल तर बोलवा तुमच्या महाशक्तीला. आणि सीमावर्ती भागाला केंद्रशासित भागाचा दर्जा द्या, असं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं.

Follow Us
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.