AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक ‘या’साठी भाजपमध्ये जाणार”, संजय राऊत यांनी 2 मोठी कारणं सांगितली…

संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि शिंदेगटावर टीका केली आहे. काय म्हणालेत. पाहा...

शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक 'या'साठी भाजपमध्ये जाणार, संजय राऊत यांनी 2 मोठी कारणं सांगितली...
| Updated on: Jan 02, 2023 | 11:01 AM
Share

मुंबई : “शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही. शिंदेगटही (CM Eknath Shinde) टिकणार नाही. शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक स्वत:ला भाजपमध्ये विलिन करून घेतील. हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे”, असं शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि शिंदेगटावर टीका केली आहे.

राऊतांनी दोन कारणं सांगितली…

शिंदेगटातील नेत्यांना शिवसेना स्विकारणार नाही आणि दुसरा त्यांच्याकडे कोणता पर्याय नाही. त्यामुळे शिंदेगटातील नेते भाजपत जाणार, असं राऊत म्हणालेत.

दीपक केसरकर यांनी जुळवून घेण्याची भाषा शिंदेगटात सध्या काय चाललं आहे, याची कल्पना येते. शिंदेगटात टोळी युद्ध सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी एवढे नेते शिवसेनेतून बाहेर का पडले याचं आत्मपरिक्षण करावं.जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं दीपक केसरकर यांनी काल शिर्डीत बोलताना म्हटलं. त्याला आता राऊतांनी उत्तर दिलं आहे.

आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरे शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार आम्हाला करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे, जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही, असं राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाही वाढत आहे. दीपक केसरकर यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे. त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहे आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे, असं राऊत म्हणालेत.

भारत जोडो यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे. पुन्हा एकदा देशाला एकतेचा संदेश देणारी यात्रा आहे. जर कोणी देश जोडण्याचा बोलत असेल तर पूर्ण देश त्याच्यासोबतच जाईल. राहुल गांधी यांच्या पाठिशी जनता आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे, असं राऊत म्हणालेत.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.