AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक ‘या’साठी भाजपमध्ये जाणार”, संजय राऊत यांनी 2 मोठी कारणं सांगितली…

संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि शिंदेगटावर टीका केली आहे. काय म्हणालेत. पाहा...

शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक 'या'साठी भाजपमध्ये जाणार, संजय राऊत यांनी 2 मोठी कारणं सांगितली...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 02, 2023 | 11:01 AM
Share

मुंबई : “शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही. शिंदेगटही (CM Eknath Shinde) टिकणार नाही. शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक स्वत:ला भाजपमध्ये विलिन करून घेतील. हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे”, असं शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि शिंदेगटावर टीका केली आहे.

राऊतांनी दोन कारणं सांगितली…

शिंदेगटातील नेत्यांना शिवसेना स्विकारणार नाही आणि दुसरा त्यांच्याकडे कोणता पर्याय नाही. त्यामुळे शिंदेगटातील नेते भाजपत जाणार, असं राऊत म्हणालेत.

दीपक केसरकर यांनी जुळवून घेण्याची भाषा शिंदेगटात सध्या काय चाललं आहे, याची कल्पना येते. शिंदेगटात टोळी युद्ध सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी एवढे नेते शिवसेनेतून बाहेर का पडले याचं आत्मपरिक्षण करावं.जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं दीपक केसरकर यांनी काल शिर्डीत बोलताना म्हटलं. त्याला आता राऊतांनी उत्तर दिलं आहे.

आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरे शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार आम्हाला करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे, जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही, असं राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाही वाढत आहे. दीपक केसरकर यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे. त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहे आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे, असं राऊत म्हणालेत.

भारत जोडो यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे. पुन्हा एकदा देशाला एकतेचा संदेश देणारी यात्रा आहे. जर कोणी देश जोडण्याचा बोलत असेल तर पूर्ण देश त्याच्यासोबतच जाईल. राहुल गांधी यांच्या पाठिशी जनता आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे, असं राऊत म्हणालेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान