AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शशिकांत वारिसेंचा खून झाला, तिथले 4 CCTV बंद कसे? सामंत म्हणतात Plan होता, तर मग यात कोण कोण? संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं!

घटनास्थळाजवळ पेट्रोल पंपावर 8 कर्मचारी होते. आठही कर्मचाऱ्यांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जातोय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

शशिकांत वारिसेंचा खून झाला, तिथले 4 CCTV बंद कसे? सामंत म्हणतात Plan होता, तर मग यात कोण कोण? संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 17, 2023 | 12:41 PM
Share

दिनेश दुखंडे, रत्नागिरीः राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कालपासून कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर संजय राऊत यांनी त्यापूर्वीच वारिसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली. वारिसे यांची हत्या झाली. मात्र हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी तिचा तपास निःपक्षपाती होईल का, अशीच शंका आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं, त्या पेट्रोल पंप आणि त्या आजू-बाजूचे ३-४ सीसीटीव्ही एकचा वेळी बंद कसे, असा मोठा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. म्हणजेच स्थानिक पोलिसदेखील दबावाखाली काम करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?

वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कोकणातला तरुण पत्रकार अशा प्रकारे मारला गेला. त्याला मारण्यात आलं, हे सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. या कोकणातून महाराष्ट्राला आणि देशाला प्रमुख पत्रकार दिले. लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर कोकणातले आहेत. त्याच भूमीत एक तरुण पत्रकार, त्याच्या भूमिका कुणाला पटत नाहीत म्हणून त्याला चिरडून, गाडीखाली फरपटत मारला जातो.

आता बिहारला महाराष्ट्राची उपमा

पूर्वी बिहारमधील गुंडगिरीची उपमा दिली जायची. आता बिहारलाच महाराष्ट्राची उपमा दिली जाते, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ पूर्वी अशा घटना बिहारमध्ये घडत होत्या. आता बिहारला म्हटलं जातंय, तुमचा महाराष्ट्र झालाय का? ही हत्या साधी नाही. लोक ठरवत असतात, काय हवंय, काय नको. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार मारला जातो. त्यामागे कोण आहे, याचा तपास करावा.. हा तपास स्वतंत्रपणे निःपक्षपाती होईल का ही आजही शंका आहे.यात राजकीय षडयंत्र आहे. शशिकांत हा रिफायनरीच्या विरोधात सातत्याने लिहित होता. त्यातून ही हत्या झाली आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय.

या गोष्टींवर तपासाची मागणी..

  •  राजापूर रिफायनरीच्या आसपास जे जमीनदार आहेत. बाहेरून ज्यांनी जमिनी खरेदी केल्या. त्यात कुणाचे हात आहेत, यावर तपास झाला पाहिजे.
  • जो संशयित मारेकरी कोठडीत आहे. त्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी होते, पक्षाशी होते, हा तपासाचा विषय आहे.
  • ११ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली. ते कोण आहेत? या देशात कोणतीही यंत्रणा स्वतंत्र नाही. न्यायालयापासून अनेक संस्थांवर राजकीय दबाव आहेत. त्याखालीच कारवाया चालतात. या खुनाचा तपास त्या पद्धतीने होईल का? हा तपासाचा विषय आहे.
  • जिथे खून झाला… वारिसे खुनाची जागा पेट्रोल पंप,त्या भागातले तिन्ही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे? त्याचं फुटेज मिळत नाहीये. पेट्रोलपंपावर ८ कर्मचारी होते. आठही कर्मचाऱ्यांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जातोय. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणतात की प्लॅन करून खून केला… प्लॅन एकट्याचा होत नाही. मग त्यात कोण कोण आहेत, हा तपासाचा विषय आहे..
  •  स्थानिक पोलीस तिथपर्यंत का पोहोचले नाहीत, हा तपासाचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच