AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली? निकाल कुठे झुकतोय? तज्ज्ञ काय सांगतात?

सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल एप्रिल अखेरपर्यंत लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली? निकाल कुठे झुकतोय? तज्ज्ञ काय सांगतात?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 17, 2023 | 11:41 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष (Maharashtra political crisis) अंतिम टप्प्यावर असतानाच ठाकरे (Thackeray) गटाला सेटबॅक देणारी बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme court) ठाकरे गटाची महत्त्वाची मागणी फेटाळून लावली, असंच सध्याचं चित्र आहे.. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठाऐवजी सात सदस्यीय घटनापीठाकडे द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने सध्या तरी ही मागणी फेटाळली आहे. हा खटला पाच सदस्यीय घटनापीठासमोरच सादर होईल. मंगळवारपासून सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल. मंगळवारनंतर होणाऱ्या युक्तिवादातून हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे द्यायचं का, यासंबंधीचा निर्णय दिला जाईल, असे म्हटले जात आहे.  शिंदे गटासाठी हा दिलासादायक निर्णय असल्याचं म्हटलं जातंय.

सध्या कुणाचं पारडं जड?

सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची मागणी नाकारल्यानंतर सध्या एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांचं पारडं जड असल्याचं वक्तव्य अॅड. सिद्धार्थ शिंदे केलंय. त्यामुळे या घटनाक्रमावर ठाकरे गटाकडून अधिक तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

उल्हास बापट काय काय म्हणाले?

आतापर्यंत नबाम रेबिया आणि किहोटो खटले महाराष्ट्रात लागू होतात की नाही, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कुठपर्यंत मर्यादित आहेत, यासंबंधीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद झाला. मंगळवारनंतर पक्ष सोडला याचा अर्थ काय.. दोन तृतीयांश लोक एकाच वेळी पक्ष सोडू शकतात की हळू हळू सोडता येतो, पक्षातून बाहेर पडलेल्यांना विलीनीकरण अनिवार्य आहे का..

सभापतींचे अधिकार- अविश्वासा ठरावाचा परिणाम, राज्यपालांचे अधिकार नेमके काय आहेत की ही नाममात्र पोस्ट आहे. राज्यपालांनी काही बाबतीत- मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करायचं का, अशा मुद्द्यांवर युक्तिवाद होईल, असे उल्हास बापट म्हणाले.

अंतिम निर्णय कधी?

सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणी मंगळवारपासून सुरु होणार आहे. काही मुद्द्यांवर विसंवाद आहेत. तसेच घटनापीठातील दोन न्यायमूर्ती पुढील दोन महिन्यात निवृत्त होणार आहेत. तसेच 15 मे पासून कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्या असतात. त्यामुळे सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल एप्रिल अखेरपर्यंत लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निकाल महाराष्ट्रासाठी बंधनकारक

मंगळवारपासून सुरु होणारी सुनावणी ही पाच सदस्यीय घटनापीठासमोर केली जाईल. ठाकरे गटाची मागणी मान्य करून हा खटला सात सदस्यीय घटनापीठासमोर मांडला गेला असता तर खटल्याचा निकाल संपूर्ण देशासाठी लागू झाला असता. मात्र पाच सदस्यीय घटनापीठाचा निकाल यापुढे फक्त महाराष्ट्रासाठी बंधनकारक असेल, अशी माहिती उल्हास बापट यांनी दिली.

Follow Us
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण