AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : गुलाबरावांचा जुलाबराव होईल, 50 खोकी पचणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून उभारला गेलेला आहे. अगदी सामान्यातील सामान्यांना देखील या पक्षामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण काहींना याचा विसर पडला. सर्वसामान्य जनता मात्र आजही पक्षाच्या पाठीशी ठाम आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. आज प्रतिकूल परस्थिती आहे पण अशी भूमिका घेणाऱ्यांना शिवसैनिकांची हाय लागणार असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे.

Sanjay Raut : गुलाबरावांचा जुलाबराव होईल, 50 खोकी पचणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
खा. संजय राऊत
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 09, 2022 | 1:50 PM
Share

नाशिक :  (Shivsena) शिवसेनेतील आमदारांनी बंड करुन आता भाजपाबरोबर सत्ता स्थापनही केली. असे असताना आमदारांकडून (Rebel MLA) बंडाच्या निर्णयाबाबत वेगवेगळी कारणेही सांगितली गेली. मात्र, जनतेचा विकास आणि मतदार संघात विकास कामासाठी निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे हे वेगळेच असल्याचा घणाघात खा. संजय राऊत यांनी केला आहे. (Gulabrao Patil) गुलाबराव पाटलांचा तर जुलाबराव असे म्हणत त्यांना ते देण्यात आलेले 50 खोके कधीच पचणार नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेने सर्वसान्यांना संधी देऊन नेतृत्व उभा केले त्याचाच विसर जर यांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नसल्याचे राऊतांनी सांगितले.नाशिक येथे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दाखल झालेल्या राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर टीका केली.

बंडाचे खरे कारण गुलदस्त्यामध्येच

बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणे दिली आहेत. पण खरं कारण त्यांच्याकडून लपवलं जात आहे. त्यांना निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. आता हे बंडखोर आमदार संजय राऊताला आणि शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरत असले तरी यामागची कारणे वेगळी आहेत. ती आणखीन यांनी समोर आणलेलीच नाही असे सांगत हे सर्व पैशासाठी केल्याचा आरोपीही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे. आता तरी त्यांनी खरं कारण सांगावे असे खुले आव्हानच त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून केले आहे.

शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही

बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून उभारला गेलेला आहे. अगदी सामान्यातील सामान्यांना देखील या पक्षामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण काहींना याचा विसर पडला. सर्वसामान्य जनता मात्र आजही पक्षाच्या पाठीशी ठाम आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. आज प्रतिकूल परस्थिती आहे पण अशी भूमिका घेणाऱ्यांना शिवसैनिकांची हाय लागणार असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे. त्यामुळे बंडखोरांच्या भूमिकेवर आजही संजय राऊतांकडून टीकास्त्र हे सुरुच आहे. एकीकडे संजय राऊतांमुळेच ही वेळ आल्याचे बंडखोर आमदार सांगत आहेत तर दुसरीकडे राऊतांची फटकेबाजी ही सुरुच आहे.

शिवसेना नव्हे तर आमदार फुटले

शिवसेना ही एक संघटना आहे आणि ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून तयार झालेली आहे. त्यामुळे शिवसेना ही फूटूच शकत नाही. आमदार फुटले म्हणजे शिवसेनेवर त्याचा काही परिणाम होणार नसल्याचेही राऊतांनी सांगितले. शिवसेना ही सर्वसामान्य जनतेच्या आधावर चालणारा पक्ष आहे त्यामुळे आशा आमदारांमुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाहीतर पक्षही आपला आणि धनुष्यबाणही आपला अशी घोषणा यावेळी राऊतांनी केली आहे.

Follow Us
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा