AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय?”, शिंदेगटातील मंत्र्याचा राऊतांना सवाल

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय?, शंभुराज देसाई यांचा सवाल

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय?, शिंदेगटातील मंत्र्याचा राऊतांना सवाल
| Updated on: Dec 25, 2022 | 11:40 AM
Share

मुंबई : मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली पण कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा निघालेला नाही, असं म्हणत संजय राऊत वारंवार टीका करत आहेत. त्याला शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय ? ठाकरे सेनेचे नेते दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर कसे येऊन उभे राहिले?, असा सवाल त्यांनी केला आहे.

संजय राऊत तीन महिने आराम करत होते तेव्हा महाराष्ट्र शांत होता. त्यांच्या वक्तव्यानं पुन्हा महाराष्ट्र अशांत करायचा आहे का ? संजय राऊतांनी बोलण्याचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करू , असं म्हणत देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.

संजय राऊतांना म्हणावं आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा घणाघात शंभुराज देसाई यांनी केला आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशात सभागृहात वारंवार गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागत आहे. त्यावरही शंभुराज देसाई यांनी भाष्य केलंय.

आम्ही सभागृहात चर्चा करायला तयार आहोत.सभागृहात चिखलफेक काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनाच करतीये, असं देसाई म्हणालेत.

आम्ही लवकरच बेळगावला जाणार आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिवांना पत्र लिहून आम्ही कळवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.