AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!

शिवसेनेत असे अनेक नेते आहेत, ज्यांनी तळागाळातील शिवसैनिक म्हणून आपली राजकीय सुरुवात केली आणि चार-चार किंवा पाच-पाच वेळा आमदार आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद न देता, गेल्या काही वर्षात शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे.

शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!
| Edited By: | Updated on: Jun 16, 2019 | 10:51 AM
Share

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत असून, यात एकूण 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपचे 10, शिवसेनेचे 2 आणि रिपाइं-आठवले गटाचे एक मंत्री शपथ घेतील. विशेष म्हणजे, शिवसेनेला केवळ दोन मंत्रिपदं मिळणार आहेत, ती दोन्ही मंत्रिपदं कॅबिनेट असतील. शिवसेनेच्या कोट्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्रिपदं राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांनाच मिळणार आहेत.

बीडमधील नेते जयदत्त क्षीरसागर आणि यवतमाळमधील विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले नेते आहेत. जयदत्त क्षीरसागर हे दोन-तीन आठवड्यांपूर्वीच शिवसेनेत आले आहेत, तर तानाजी सावंत यांनी 2015 साली शिवसेनेत प्रवेश केला.

क्षीरसागर आणि सावंत या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन शिवसेना आयारामांना थेट कॅबिनेटपदी विराजमान करुन, पक्षात वर्षानुवर्षे काम करत असणाऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आहे.

शिवसेनेत असे अनेक नेते आहेत, ज्यांनी तळागाळातील शिवसैनिक म्हणून आपली राजकीय सुरुवात केली आणि चार-चार किंवा पाच-पाच वेळा आमदार आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद न देता, गेल्या काही वर्षात शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

  • राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश
  • बीडच्या केशरकाकू क्षीरसागरांचे पुत्र
  • 2009 मध्ये प्रथम विधानसभेवर निवडून गेले
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
  • 2014 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवड
  • विधानसभेतील राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते
  • मराठवाड्यात ओबीसीचे राजकारण
  • मुंडे घराण्याशी सलोख्याचा संबंध
  • तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानं मोदींशी संवाद
  • क्षीरसागर कुटुंब उच्चशिक्षित म्हणून प्रसिद्ध

तानाजी सावंत कोण आहेत?

  • यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार
  • 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत
  • खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी ओळख
  • उस्मानाबादच्या राजकारणावर चांगली पकड
  • कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत मोठे स्थान
  • ‘लक्ष्मी’पुत्र अशी शिवसेनेत खासगीमधली ओळख
  • सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रहिवासी
  • राष्ट्रवादीचे बबन शिंदेंविरोधात तीनदा निवडणूक लढवली
  • दोनवेळा शिवसेनेकडून निवडणूक लढवली
  • एकदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली
  • राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे समर्थक म्हणून ओळख

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली