AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | औरंगाबादेत शिंदे गट आणि भाजपा युतीची चर्चा, ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊत म्हणाले…

संजय राऊत म्हणाले, 'शिवसेना सर्व निवडणुका लढेल, स्वतंत्रपणे लढेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढेल, याविषयी एकत्र बसून निर्णय घेतला जाईल.

Sanjay Raut | औरंगाबादेत शिंदे गट आणि भाजपा युतीची चर्चा, ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊत म्हणाले...
संजय राऊत, शिवसेना खासदारImage Credit source: social media
| Updated on: Jul 28, 2022 | 10:46 AM
Share

मुंबईः एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडल्यानंतर राज्यात मोठं सत्तापरिवर्तन झालं. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार, महाविकास आघाडी कायम ठेवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच औरंगाबाद महानगरपालिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. औरंगाबाद महापालिकेत शिंदे गट आणि भाजप युती करणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये महापालिकेतील जागा वाटपाबद्दलही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर संजय राऊतांनीही (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. शिंदे गट काय निर्णय घेईल, याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, पण शिवसेना फोडण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाही, असं ते म्हणाले.

ठाकरेंची शिवसेना काय करणार?

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि भाजपात युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना काय करणार, असा सवाल संजय राऊतांना विचारला असता ते म्हणाले, ‘शिवसेना सर्व निवडणुका लढेल, स्वतंत्रपणे लढेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढेल, याविषयी एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. पण आम्ही भाजपाला शिवसेना फोडायची होती. ती फोडून अशा प्रकारे महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांत महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करणारं त्यांचं कारस्थान होतं. आता जरी त्यांना यश मिळताना दिसत असलं तरीही हे दीर्घकाळ टीकणारं नाही…

जालन्याच्या अर्जुन खोतकरांचं कौतुक…

जालन्याचे अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर आहेत. राऊतांनी मात्र खोतकरांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘ मी अर्जुन खोतकरांचं निवेदन ऐकलं. त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. ते फार जुने सहकारी आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावर आणि कुटुंबावर कोणत्या प्रकारचा तणाव आहे. कोणत्या यंत्रणेचा आहे.. त्यामुळे अशा संकटाच्या काळात कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. हे त्यांनी प्रामाणिक सांगितलं. त्याने हिंदुत्वाला बदनाम केलं नाही. आम्ही हिंदुत्वामुळे सोडतोय. उद्धव ठाकरे यांच्यावर काही आक्षेप असल्यामुळे शिवसेना सोडतोय. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप घेतोय ,अशी भूमिका न घेता अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर दबाव असल्याचं स्पष्ट केलं. हे जास्त चांगलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.