मुंबईनंतर औरंगाबादेतही भाजप-शिवसेनेचं मानापमान नाट्य

औरंगाबाद : मुंबईतील मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनात शिवसेना-भाजपात मानापमानाचं नाटक रंगलं. नाटकाचा पुढचा भाग आता औरंगाबादेत रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. औरंगाबादेत येत्या 23 तारखेला 100 कोटींच्या रस्त्याचं भूमीपूजन आणि शहर बससेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुणालाही आमंत्रित करण्यात आलं नाही. […]

मुंबईनंतर औरंगाबादेतही भाजप-शिवसेनेचं मानापमान नाट्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

औरंगाबाद : मुंबईतील मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनात शिवसेना-भाजपात मानापमानाचं नाटक रंगलं. नाटकाचा पुढचा भाग आता औरंगाबादेत रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. औरंगाबादेत येत्या 23 तारखेला 100 कोटींच्या रस्त्याचं भूमीपूजन आणि शहर बससेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुणालाही आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने पैसा दिला म्हणून हे शक्य झालं तरी शिवसेना यशाचं श्रेय एकटंच घेण्यासाठी भाजपला डावलत असल्याचा आरोप भाजपने केलाय.

अखेर सारवासारव करण्यासाठी आज शिवसेनेच्या महापौरांसह काही नेते मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र इतक्या उशिराने आमंत्रण दिल्याने मुख्यमंत्री येणार का असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात. त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी हे उशिराचं आमंत्रण देण्याचा घाट शिवसेनेने घातल्याचा आरोप होतोय. विकासकामांच्या उद्घाटनावरून आता शिवसेना-भाजपात चांगलंच मानापमानाचं नाटक रंगणार असं चित्र आहे.

मुंबईत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये मेट्रोच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. तर कोस्टल रोडचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठीही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

भाजप आणि शिवसेना राज्यात जसे सत्तेत एकत्र आहेत. तसेच शिवसेना आणि भाजप औरंगाबाद महापालिकेतही एकत्र आहेत. योजनांसाठी पैसा सरकारकडून मिळणार आहे. पण श्रेय घेण्याची लढाई ही वादाचं कारण बनली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.