AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसैनिक हळहळले; मातोश्रीतून ‘तो’ धनुष्यबाणही गेला, कार्यकर्ते कासावीस

उद्धव ठाकरे यांना मिळालेलं मशाल हे चिन्हदेखील पुण्यातील पोट निवडणुका होईपर्यंतच राहिल, अशा सूचनाही आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत.

शिवसैनिक हळहळले; मातोश्रीतून 'तो' धनुष्यबाणही गेला, कार्यकर्ते कासावीस
Image Credit source: social media
| Updated on: Feb 25, 2023 | 9:57 AM
Share

मुंबई : शिवसेना (Shivsena) हे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. एकिकडे आयोगाचं आयुध वापरून शिंदे गट एकानंतर एक पाऊल उचलत आहे. शिवसेनेचा बचाव करण्यासाठी उद्धव ठाकरे अखेरचे, शर्थीचे प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालालाच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. ही केस सुप्रीम कोर्टात प्रलंबित असली तरीही आयोगाचा निर्णय तोपर्यंत स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया करणं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही बंधनकारक आहे. त्यामुळेच शिवसेनेचे महत्त्वाचे निर्णय जिथे घेतले जातात त्या मातोश्री बंगल्यावरील मुख्य बैठकीच्या ठिकाणचे धनुष्यबाण हे चिन्ह काढून टाकण्यात आल्याचं दिसून आलंय.

अरविंद केजरीवाल यांच्या भेटीत काय दिसलं? निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला नव्हता, तोपर्यंत मातोश्रीच्या मुख्य बैठक कक्षात धनुष्यबाण आणि मशाल ही दोन्ही चिन्ह लावण्यात आली होती. तसेच शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नाव होते. मात्र काल आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवरील बैठक कक्षातील शिवसेना नाव आणि धनुष्यबाण काढून टाकण्यात आल्याचं दिसून आलं. मातोश्रीतील हा मोठा बदल शिवसैनिकांच्या नजरेतून सुटला नाही. शिवसेनेच्या इतिहासातील या मोठ्या स्थित्यंतरानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

शिवसैनिकांमध्ये हळहळ

मातोश्रीतील मुख्य कक्षातील धनुष्यबाण चिन्ह गायब झाल्याचे दृश्य पाहिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीला ठाणे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा ढाल- तलवार हे शिवसेनेचं मुख्य चिन्ह होतं. त्यानंतर रेल्वे इंजिन, मशाल आदी चिन्ह मिळाली. १९८९ मध्ये शिवसेनेला अधिकृतरित्या धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. तेव्हापासून शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दीत धनुष्यबाण चिन्हाचं महत्त्व अधिक वाढत गेलं. अधिक ठसत गेलं. मात्र शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीवर हे चिन्ह गमावण्याची वेळ आली आहे.

मशाल चिन्ह कधीपर्यंत?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मिळालेलं मशाल हे चिन्हदेखील पुण्यातील पोट निवडणुका होईपर्यंतच राहिल, अशा सूचनाही आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणुकांसाठी उद्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन चिन्हासाठीचे पर्याय आयोगाकडे द्यावे लागणार आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.