AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगोलीत शिवसेनेचा उमेदवारच भाजपमध्ये गेला, नव्या उमेदवारासाठी शोधाशोध

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी राजकीय गणितं शिवसेनेच्याच 2014 च्या उमेदवाराने बदलली आहेत. कारण 2014 साली शिवसेनेकडून ज्यांनी हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती, ते सुभाष वानखेडे आता भाजपच्या गोटात सामिल झाले होते. मात्र, युती झाल्याने सुभाष वानखेडेंना आपलं वेगळं अस्तित्त्व दाखवता येणार नसले, तरी […]

हिंगोलीत शिवसेनेचा उमेदवारच भाजपमध्ये गेला, नव्या उमेदवारासाठी शोधाशोध
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी राजकीय गणितं शिवसेनेच्याच 2014 च्या उमेदवाराने बदलली आहेत. कारण 2014 साली शिवसेनेकडून ज्यांनी हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती, ते सुभाष वानखेडे आता भाजपच्या गोटात सामिल झाले होते. मात्र, युती झाल्याने सुभाष वानखेडेंना आपलं वेगळं अस्तित्त्व दाखवता येणार नसले, तरी अंतर्गत गटबाजीचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.

सेनेचा उमेदवार भाजपमध्ये!

2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सुभाष वानखेडे उमेदवार होते. मात्र, शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे सुभाष वानखेडे पराभूत झाले आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नव्या उमेदवाराची सेनेकडून शोधाशोध

शिवसेना-भाजप युतीच्या फॉर्म्युल्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. त्यामुळे शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी हिंगोलीतून उमेदवाराची शोधाशोध सुरु केली आहे. वसमतचे विद्यमान आमदार डॉ.  जयप्रकाश मुंदडा, नांदेडचे आमदार हेमंत पाटील, डॉ. बी. डी. चव्हाण यांची नावे शिवसेनेच्या गोटात सध्या चर्चेत आहेत.

काँग्रेसचं हिंगोलीत वर्चस्व

2014 साली मोदी लाट असूनही हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राजीव सातव हे जिंकले. राजीव सातव हे 1632 मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसची हिंगोलीत ताकद आहे. 2014 साली राज्यात काँग्रेसच्या दोनच जागा निवडून आल्या, त्यात एक नांदेडची होती आणि दुसरी हिंगोलीची. त्यामुळे हिंगोलीतून काँग्रेस विजयाची खात्री बाळगून असते. अशा काळात शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या :

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.